शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

‘कृषी संजीवनी’ला जिल्ह्यात मिळेना उभारी

By admin | Updated: March 16, 2015 00:52 IST

बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत

बीड : कृषी संजीवनी योजनेत कृषीपंपधारकांना मार्च २०१४ अखेरपर्यंतच्या थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरून त्यानंतरची चालू बिले अदा करावयाची आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिती व बिले अदा करायची मानसिकताच नसल्यामुळे या योजनेचा कालावधी वाढविला तरीही संजीवनीच मिळाली नाही. आॅगस्ट २०१४ ला योजनेचा प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात येथील मंडळातून योजनेला उभारी देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ग्राहकांना योजनेची माहिती होण्यासाठी वीज बिलासोबत योजनेची माहिती पुस्तिका देण्यात आली तसे स्थनिक पातळीवर अभियंत्यांनी योजनेची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिली. मात्र काळाच्या ओघात योजनेला मरगळ आली. १ आॅगस्ट ते ३१ आॅक्टोबर या योजनेच्या कालावधीत लातूर, बीड, उस्मानाबाद परिमंडळात ४६ हजार धारकांनी लाभ घेतला होता तर बीड मंडळातून फक्त १४,७२६ ग्राहकांनी लाभ घेतला. योजनेला समाधानकारक ग्राहकसंख्या न मिळाल्याने योजनेत तब्बल ५ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीमध्ये महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारी पोहचिवणे अपेक्षित होते. उलटार्थी या चार महिन्याच्या कालावधीत बीड मंडळातून फक्त ७७५ ग्राहकांची भर पडली आहे. मुदतवाढीचा फायदा तर सोडाच मात्र यंत्रणेवर महावितरणचा अधिक खर्च झाला आहे. योजनेचा उरला पंधरवाडा तब्बल पाच महिन्यांची मुदतवाढ करून देखील ग्राहकांची संख्या वाढली नाही. ३१ मार्चला योजनेचा शेवट होणार आहे. त्यामुळे शेतीपंप धारकांकडून योजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)