शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

पावसाचा महिना सरला; नालेसफाई कागदावरच !

By admin | Updated: June 23, 2016 01:14 IST

लातूर : पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील विविध भागांत मोठ्या आकाराचे नाले बांधलेले आहेत. नाले साफ केले नसल्यामुळे अनेकदा अनेक वस्त्यांतील

लातूर : पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील विविध भागांत मोठ्या आकाराचे नाले बांधलेले आहेत. नाले साफ केले नसल्यामुळे अनेकदा अनेक वस्त्यांतील घरांत पावसाचे पाणी घुसल्याचा पूर्वानुभव आहे. तरीही मनपा प्रशासनाचे यंदा नाले सफाईकडे दुर्लक्षच आहे. काही नगरसेवकांनी दोन महिन्यांपूर्वी हमला पद्धतीने नालेसफाई करावी, अशी मागणी केली. परंतु, अद्याप या मोहिमेला प्रारंभ झाला नाही. आता पावसाचा एक महिना उलटत आला तरी नालेसफाईकडे डोळेझाक आहे.शहरातील क्वाईल नगर, समता नगर, मंत्री नगर, बस्तापुरे नगर, नारायण नगर आदी सखल भागांमध्ये नाले साफ केले नसल्यामुळे अनेकवेळा पावसाचे पाणी घरात घुसून जनजीवन विस्कळीत झाले होते. क्वाईल नगर झोपडपट्टीतील नागरिकांना मागे एकदा घरात पाणी घुसल्याने स्थलांतर करण्याची वेळ आली होती. केवळ नाल्यांची स्वच्छता न केल्याने ही परिस्थिती ओढवली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेता मनपाने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करणे आवश्यक होते. मात्र या सफाईच्या कामाला अद्याप प्रारंभ झाला नाही. गंजगोलाईच्या पूर्व भागांतील काही नगरांमध्ये सफाई करण्यात आली आहे. परंतु, सध्या मनपाचे जेसीबी यंत्र वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यासाठी नेले आहेत. त्यामुळे मोठ्या नाल्यांची सफाई रखडली असल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसांत खड्डे खोदून झाल्यानंतर या जेसीबी यंत्राद्वारे मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. सद्य:स्थितीत मात्र नालेसफाईचे काम बंद आहे. काही नगरसेवकांच्या मागणीमुळे पंधरा दिवसांपूर्वी काम करण्यात आले होते. तेही मोजक्याच भागांत करण्यात आले आहे. त्यानंतर खड्डे खोदण्याच्या नावाखाली हे काम बंद झाले आहे. मोठ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या नाल्यांमधून पाण्याचा निचराच होऊ शकत नाही. एक-दोन मोठे पाऊस झाले तर नाले तुंबून घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. याबाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा पाऊस झाला नसल्यामुळे मनपा बेफिकीर दिसत आहे.