शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

वीस घरात घुसले पावसाचे पाणी

By admin | Updated: July 28, 2016 00:50 IST

उस्मानाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे गालिबनगरातील एक -दोन नव्हे, तर तब्बल पंधरा ते वीस घरांमध्ये पाणी घुसले.

उस्मानाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे गालिबनगरातील एक -दोन नव्हे, तर तब्बल पंधरा ते वीस घरांमध्ये पाणी घुसले. वारंवार हा प्रश्न मांडूनही संबंधित नगरसेवक अथवा प्रशासनाने लक्ष दिले नाही, असा आरोप करीत चाळीस ते पन्नास रहिवासी बुधवारी पालिकेत धडकले. यावेळी रहिवाशांनी अक्षरश: पश्नांचा भडीमार करीत ‘आता मतदान मागायला तर या, मग सांगू’ अशा शब्दात संताप व्यक्त केला. नगराध्यक्ष संपत डोके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देऊन गालिबनगर परिसरात जावून पाहणीही केली.शहरातील शिरीन कॉलनी, सुलतानपुरा, अभिनव इंग्लिस स्कूल रोड आणि गालिबनगर या भागातील मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अंतर्गत रस्त्यांचा पत्ता नाही. तसेच काही ठिकाणी नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपणी रस्त्यावर येते. पावसाळ्यात तर प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागते. एवढेच नाही, तर काही ठिकाणी पथदिव्यांचीही सोय नसून सापांचाही वावर वाढला आहे. मागील निवडणुकीमध्ये सर्वच सर्वच उमेदवारांकडून उपरोक्त प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली होती. त्यांना निवडूनही दिले. चार ते साडेचार वर्षांचा कालावधी सरला. मात्र, आजही प्रश्न जैसे थे आहेत. जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, कोणीही लक्ष दिले नाही. असे असतानाच मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे शिरीन कॉलनी परिसरातील तब्बल १५ ते २० घरामध्ये पाणी घुसले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट पालिका गाढून उपस्थित पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. ‘निवडणुकीमध्ये आश्वासने दिली, एकही नगरसेवक गालिबनगरात फिरकला नसल्याचे सांगत आता मतदान मागायला तर या, मग सांगू’, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावर नगराध्यक्ष संपत डोके यांनी संबंधित रहिवाशांचे म्हणणे एकून घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी शाहीद शेख, मुजाहीद शेख, इम्रन शेख, ताहेर शेख, साजीद शेख, रोहण सय्यद, सद्दाम शेख, मोहसीन सय्यद, तोफिक शेख, आरमान शेख, गनी शेख, मन्सूर खॉन, साबेर मोमीन, अमर शेख, बब्लू पठाण, जमशेर पठाण, गौस तांबोळी, आमीर शेख, सलीम शेख, अजीम मोमीन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.