शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

वीस घरात घुसले पावसाचे पाणी

By admin | Updated: July 28, 2016 00:50 IST

उस्मानाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे गालिबनगरातील एक -दोन नव्हे, तर तब्बल पंधरा ते वीस घरांमध्ये पाणी घुसले.

उस्मानाबाद : मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे गालिबनगरातील एक -दोन नव्हे, तर तब्बल पंधरा ते वीस घरांमध्ये पाणी घुसले. वारंवार हा प्रश्न मांडूनही संबंधित नगरसेवक अथवा प्रशासनाने लक्ष दिले नाही, असा आरोप करीत चाळीस ते पन्नास रहिवासी बुधवारी पालिकेत धडकले. यावेळी रहिवाशांनी अक्षरश: पश्नांचा भडीमार करीत ‘आता मतदान मागायला तर या, मग सांगू’ अशा शब्दात संताप व्यक्त केला. नगराध्यक्ष संपत डोके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देऊन गालिबनगर परिसरात जावून पाहणीही केली.शहरातील शिरीन कॉलनी, सुलतानपुरा, अभिनव इंग्लिस स्कूल रोड आणि गालिबनगर या भागातील मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अंतर्गत रस्त्यांचा पत्ता नाही. तसेच काही ठिकाणी नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपणी रस्त्यावर येते. पावसाळ्यात तर प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागते. एवढेच नाही, तर काही ठिकाणी पथदिव्यांचीही सोय नसून सापांचाही वावर वाढला आहे. मागील निवडणुकीमध्ये सर्वच सर्वच उमेदवारांकडून उपरोक्त प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली होती. त्यांना निवडूनही दिले. चार ते साडेचार वर्षांचा कालावधी सरला. मात्र, आजही प्रश्न जैसे थे आहेत. जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, कोणीही लक्ष दिले नाही. असे असतानाच मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे शिरीन कॉलनी परिसरातील तब्बल १५ ते २० घरामध्ये पाणी घुसले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी थेट पालिका गाढून उपस्थित पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. ‘निवडणुकीमध्ये आश्वासने दिली, एकही नगरसेवक गालिबनगरात फिरकला नसल्याचे सांगत आता मतदान मागायला तर या, मग सांगू’, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावर नगराध्यक्ष संपत डोके यांनी संबंधित रहिवाशांचे म्हणणे एकून घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी शाहीद शेख, मुजाहीद शेख, इम्रन शेख, ताहेर शेख, साजीद शेख, रोहण सय्यद, सद्दाम शेख, मोहसीन सय्यद, तोफिक शेख, आरमान शेख, गनी शेख, मन्सूर खॉन, साबेर मोमीन, अमर शेख, बब्लू पठाण, जमशेर पठाण, गौस तांबोळी, आमीर शेख, सलीम शेख, अजीम मोमीन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.