शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

‘समृद्धी’च्या मोजणीवर आक्षेपांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:34 IST

३५० शेतकºयांनी संयुक्त मोजणीबाबत एमएसआरडीसीच्या शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील ज्या गावांमधून जाणार आहे, तेथील जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. मात्र, यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे बाधित शेतकºयांचे म्हणणे आहे. ३५० शेतकºयांनी संयुक्त मोजणीबाबत एमएसआरडीसीच्या शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केले आहेत.समृद्धी महामार्गासाठी जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधील ५१२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. संपादित केल्या जाणाºया जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या मोजणीमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या बहुतांश शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अनेक शेतकºयांच्या समृद्धी महामार्गात जाणाºया पाइपलाइन, झाडे, जनावरांचे गोठे, विहिरी, ठिबक सिंचन, शेततळे, कुपनलिका, द्राक्षबाग याच्या नोंदी संयुक्त मोजणीत दाखविण्यात आलेल्या नाहीत. काही गावांमध्ये बागायती जमीन कोरडवाहू दाखविण्यात आली आहे. त्यामुळे बाधित शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तब्बल ३५० शेतकºयांनी रस्ते विकास महामंडळाच्या येथील शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केला आहे.आक्षेपांची पडताळणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गासाठी २० जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन शेतकºयांच्या जमिनीची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर एकाही शेतकºयाच्या जमिनीची खरेदी झालेली नाही. शासन शेतकºयांची दिशाभूल करून जमिनीची खरेदीसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने केला आहे.