औरंगाबाद : मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंधरा दिवसांच्या पहिल्या नक्षत्रात जेमतेम सरासरी २९ मि. मी. पाऊस झाला. गतवर्षी आतापर्यंत म्हणजे १ जून ते २० जून या काळात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. तसेच मागील वर्षी विभागात आतापर्यंत जवळपास ५० टक्के पेरण्या उरकल्या होत्या. यंदा मात्र पेरण्यांना अजून सुरुवातही होऊ शकलेली नाही.गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यात यंदा आशादायी चित्र होते. चांगला पाऊस होण्याच्या अपेक्षेने बळीराजाने खरीप हंगामाची तयारी आधीच करून ठेवली होती. मात्र, पावसाने यंदा हुलकावणी दिली आहे. रविवारी मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्र लागले. मृग नक्षत्रात मराठवाड्यात कुठेही पुरेसा पाऊस झालेला नाही. विभागात १ जूनपासून २१ जूनपर्यंत सरासरी २९ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यातही औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सरासरी त्याहीपेक्षा कमीच आहे. मागील वर्षी याच काळात मराठवाड्यात ११२ मि. मी. पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीचा विचार करता हा पाऊस १४ टक्के इतका होता. कमी पावसामुळे यंदा मराठवाड्यात अद्याप पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. मागील वर्षी आतापर्यंत सर्व आठही जिल्ह्यांत सरासरी ५० टक्के पेरण्या झाल्या होत्या. तर ३० जूनपर्यंत शंभर टक्के पेरण्या झाल्या होत्या. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मराठवाड्यातील पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही ७७९ मि. मी. इतकी आहे. गतवर्षी १ जून ते २० जून या काळात विभागात सरासरी ११२ मि. मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत अवघा २९ मि. मी. पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३.७४ टक्के इतके आहे. गतवर्षी ते १४ टक्के होते. (१ जून ते २० जूनदरम्यानचा पाऊस मि. मी. मध्ये)जिल्हायंदागतवर्षीऔरंगाबाद१८१२०जालना१८१२०परभणी३३८७हिंगोली२११७२नांदेड२५१४५बीड३१८७लातूर५०९२उस्मानाबाद३३७१एकूण२९११२
मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस
By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST