शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाव : निवेदनांचा अन्् दगडांचाही

By admin | Updated: October 5, 2016 01:18 IST

औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था,

औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था, संघटना आणि व्यक्तींनी मोर्चे व निवेदनांच्या माध्यमातून मायबाप सरकारपुढे आपल्या मागण्या मांडल्या. दुपारपर्यंत सर्व काही शांततेत सुरू होते. रिमझिम पावसात सुभेदारीत मंत्रिमंडळावर निवेदनांचा ‘वर्षाव’ सुरू होता. त्याचवेळी शेवटच्या क्षणी बाहेर अचानक कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शिक्षकांवर लाठीहल्ला केला. यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली अन् निवेदनांबरोबरच दगडांच्या वर्षावात औरंगाबादेतील मंत्रिमंडळाची बैठक आटोपली....शहरात आठ वर्षांनंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मंगळवारी मोर्चे आणि निवेदनांचा अक्षरश: पाऊस पडला. शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह विविध संघटनांचे तब्बल २१ मोर्चे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर येऊन धडकले. याशिवाय मराठवाड्यातील विविध भागातून आलेले सुमारे अडीचशे शिष्टमंडळांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले. निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर झुंबड उडालीहोती. राज्य सरकारच्या वतीने महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवेदने स्वीकारली. मोर्चांना बैठक स्थळापासून दूर आमखास मैदान येथे रोखण्यात आले होते. तेथून पुढे केवळ शिष्टमंडळांनाच प्रवेश देण्यात येत होता. सुभेदारी विश्रामगृहावर निवेदन स्वीकारण्याचे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा देणार४दहा हजार कोटींच्या सिंचन योजना मंजूर होणार४औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी एक हजार कोटी रु. मिळणार४डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्थेला अर्थसहाय्य मिळणार४औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलला राज्यस्तरीय संस्थेचा दर्जा मिळणार४डीएमआयसीत नवे उद्योग येणार४औरंगाबादला जलसंधारण आयुक्तालय स्थापन होणारलोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रातील अनेक मुद्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतलेली दिसते. या पत्राची आज चर्चा होती. जिल्हा निर्मिती व विभागीय आयुक्तालयासारखे स्फोटक विषय बाजूला ठेवणार४मराठवाड्यात व्यापक वृक्षलागवडीसाठी इको बटालियनची स्थापना करणार४औरंगाबाद शहर हे युनेस्कोकडून जागतिक वारसा जाहीर व्हावे यासाठी आवश्यक कारवाईचा प्रस्ताव मंजूर करणार४जालना येथे सीड पार्क उभारणार४औरंगाबादेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार४मराठवाडा वाटर ग्रीड योजना जाहीर करणार४रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना आर्थिक तरतूद करणारस.सो. खंडाळकर ल्ल औरंगाबादबहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज औरंगाबादेत झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर अशी बैठक झाल्याने या बैठकीतील निर्णयांकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून राहिलेले होते. लोकमतने मात्र अशी बैठक व्हावी इथपासून बैठकीत कोणते कोणते निर्णय घेतले जातील, याची गेली काही दिवस परिश्रमपूर्वक मांडणी करून चर्चा घडवून आणली होती.