शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

वर्षाव : निवेदनांचा अन्् दगडांचाही

By admin | Updated: October 5, 2016 01:18 IST

औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था,

औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था, संघटना आणि व्यक्तींनी मोर्चे व निवेदनांच्या माध्यमातून मायबाप सरकारपुढे आपल्या मागण्या मांडल्या. दुपारपर्यंत सर्व काही शांततेत सुरू होते. रिमझिम पावसात सुभेदारीत मंत्रिमंडळावर निवेदनांचा ‘वर्षाव’ सुरू होता. त्याचवेळी शेवटच्या क्षणी बाहेर अचानक कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शिक्षकांवर लाठीहल्ला केला. यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली अन् निवेदनांबरोबरच दगडांच्या वर्षावात औरंगाबादेतील मंत्रिमंडळाची बैठक आटोपली....शहरात आठ वर्षांनंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मंगळवारी मोर्चे आणि निवेदनांचा अक्षरश: पाऊस पडला. शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह विविध संघटनांचे तब्बल २१ मोर्चे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर येऊन धडकले. याशिवाय मराठवाड्यातील विविध भागातून आलेले सुमारे अडीचशे शिष्टमंडळांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले. निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर झुंबड उडालीहोती. राज्य सरकारच्या वतीने महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवेदने स्वीकारली. मोर्चांना बैठक स्थळापासून दूर आमखास मैदान येथे रोखण्यात आले होते. तेथून पुढे केवळ शिष्टमंडळांनाच प्रवेश देण्यात येत होता. सुभेदारी विश्रामगृहावर निवेदन स्वीकारण्याचे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा देणार४दहा हजार कोटींच्या सिंचन योजना मंजूर होणार४औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी एक हजार कोटी रु. मिळणार४डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्थेला अर्थसहाय्य मिळणार४औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलला राज्यस्तरीय संस्थेचा दर्जा मिळणार४डीएमआयसीत नवे उद्योग येणार४औरंगाबादला जलसंधारण आयुक्तालय स्थापन होणारलोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रातील अनेक मुद्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतलेली दिसते. या पत्राची आज चर्चा होती. जिल्हा निर्मिती व विभागीय आयुक्तालयासारखे स्फोटक विषय बाजूला ठेवणार४मराठवाड्यात व्यापक वृक्षलागवडीसाठी इको बटालियनची स्थापना करणार४औरंगाबाद शहर हे युनेस्कोकडून जागतिक वारसा जाहीर व्हावे यासाठी आवश्यक कारवाईचा प्रस्ताव मंजूर करणार४जालना येथे सीड पार्क उभारणार४औरंगाबादेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार४मराठवाडा वाटर ग्रीड योजना जाहीर करणार४रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना आर्थिक तरतूद करणारस.सो. खंडाळकर ल्ल औरंगाबादबहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज औरंगाबादेत झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर अशी बैठक झाल्याने या बैठकीतील निर्णयांकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून राहिलेले होते. लोकमतने मात्र अशी बैठक व्हावी इथपासून बैठकीत कोणते कोणते निर्णय घेतले जातील, याची गेली काही दिवस परिश्रमपूर्वक मांडणी करून चर्चा घडवून आणली होती.