शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

‘रॅन्समवेअर’चा धसका; लातूरचा सायबर सेल अलर्ट !

By admin | Updated: May 19, 2017 00:04 IST

लातूर : रॅन्समवेअरच्या हल्ल्याची धास्ती जगभर असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानेही सतर्कतेचे आवाहन सायबर सेलला केले आहे.

राजकुमार जोंधळे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअरनंतर सुरक्षेचे सारे उपाय योजले जात आहेत. रॅन्समवेअरच्या हल्ल्याची धास्ती जगभर असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानेही सतर्कतेचे आवाहन सायबर सेलला केले आहे. यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल अलर्ट झाला आहे.जगभर रॅन्समवेअरच्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ‘नेट’कऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे. बनावट मेलच्या माध्यमातून असा हल्ला होण्याची शक्यता असल्याने संगणक हाताळणाऱ्यांनी अधिक दक्षता बाळगली पाहिजे. विशेषत: आॅनलाईन व्यवहार आणि इंटरनेटचा वापर करताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी आता लातूरच्या सायबर सेलने नागरिकांना आवाहन केले आहे. बनावट मेलपासून नागरिकांनी सावधानता बाळगावी. शिवाय, अनोळखी मेल उघडू नये. या मेलला कुठलाही प्रतिसाद न देता ते डिलीट् करून टाकावेत. अनोळखी नावाने आलेला मेसेज आणि मेल हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक करू शकतो. विशेषत: मोबाईलवर आलेले मेसेज आणि आॅनलाईन खरेदीच्या नावाखाली करण्यात आलेल्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून आॅनलाईन खरेदी करताना आधार लिंकिंग अथवा एटीएम कार्ड क्रमांक किंवा पॅनकार्ड क्रमांक आणि इतर माहिती मागितली जाते. एखाद्या कंपनीच्या नावाखाली बनावट मेलही अशी माहिती मागविण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक मेल आणि मोबाईलवर आलेले मेसेज काळजीपूर्वक वाचून, खात्री करून त्यासंबंधीचे व्यवहार करणे अधिक फायद्याचे ठरेल. रॅन्समवेअरच्या हल्ल्यानंतर जगभरासह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाअंतर्गत कार्यरत असलेला सायबर सेल अलर्ट झाला असून, त्यासंबंधीच्या सूचनाही लातूरच्या सायबर सेलला प्राप्त झाले आहेत.