शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पैठण, आडूळमध्ये पावसाची हजेरी

By admin | Updated: September 15, 2015 00:34 IST

पैठण : परतीच्या पावसाने पैठण तालुक्यात ६ सप्टेंबरपासून हजेरी लावली असून गेल्या आठ दिवसांपासून तालुकाभर कोठे ना कोठे तो पडत असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे.

पैठण : परतीच्या पावसाने पैठण तालुक्यात ६ सप्टेंबरपासून हजेरी लावली असून गेल्या आठ दिवसांपासून तालुकाभर कोठे ना कोठे तो पडत असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारी पैठण व आडूळ येथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.पैठण तालुक्यात पावसाने अवकृपा केल्याने रबी व खरीप दोन्ही हंगामातील पिके धोक्यात आहेत़ अशातच पावसाची आशा मावळली असताना परतीच्या पावसाने तालुक्याला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे़ ६ सप्टेंबर रोजी आडूळ येथे २१ मि़मी. पावसाची नोंद झाली आहे़ बिडकीन ९ मि़मी., तर दि़ ९ रोजी विहामांडवा ६० मि़मी. पावसाची नोंद झाली़ १० रोजी पैठण १०, पिंपळवाडी १०, नांदर १२ व विहामांडवा २५ मि़मी. पाऊस झाला़ १२ सप्टेंबर रोजी पैठण येथे ५ मि़मी. पावसाची नोंद झाली, तर पिंपळवाडी ८, बिडकीन ६, नांदर १०, विहामांडवा १२, पाचोड २५, आडूळ १२, बिडकीन १८, लोहगाव १२, ढोरकीन १८ मि़मी. अशी पावसाची नोंद झाली. परतीचा पाऊस पडता झाल्याने किमान जनावरांसाठी हिरवे वैरण उपलब्ध होण्याची आशा बळीराजास लागली आहे.सोयगाव : सोयगाव तालुक्यातील मूर्ती गावातील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. भागचंद लकीचंद चव्हाण (३७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे़ ४मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याची गट नं. १०२ मध्ये शेती असून, दि. १३ रविवार रोजी या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तेव्हा सदर शेतकरी शेतीत काम करीत असताना वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती सोयगावचे तहसीलदार नरसिंग सोनवणे यांना येथील ग्रामस्थांनी दिली. तहसीलदारांनी तलाठी डी.व्ही. गायकवाड यांना घटनास्थळी पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी (दि. १४) घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.४शेतकरी भागचंद चव्हाण यांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ नैसर्गिक आपत्तीमुळे मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्ती घटनाअंतर्गत त्वरित ३ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी विविध राजकीय पक्ष संघटनांच्या स्थानिक पुढाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.