शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

पाऊस आला धावून, पूल गेला वाहून

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

कडा: आष्टी ते डोईठाण मैंदा या रस्त्यावर असलेल्या नदीवर दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता.

कडा: आष्टी ते डोईठाण मैंदा या रस्त्यावर असलेल्या नदीवर दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता. हा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने कामाच्या दर्जाचे पितळ उघडे पडले आहे.आष्टी ते डोईठाण या रस्त्यावर बावी गाव आहे. या गावाजवळून जाणाऱ्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच पूल बांधण्यात आला होता. येथून शालेय विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, महिला मोठ्या प्रमाणावर ये- जा करतात. येथील नदीला पाणी आल्याने ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प होते. यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांमधून केली जात होती. बावीजवळील नदीवर पूल झाल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात होते. पाऊस पडल्यानंतरही शेतात ये- जा करण्यास अडचण येणार नाही, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र पहिल्याच पावसाने ग्रामस्थांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. पूल वाहून गेल्याने येथून पायी चालणेही आता जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे हा पूल तात्काळ पुन्हा दर्जेदार बांधावा, अशी मागणी होत आहे. या संदर्भात उपअभियंता पाटील म्हणाले, सध्या आपण मुंबईला आहोत. तेथे आल्यानंतर पुलाची पाहणी करून निर्णय घेऊ. (वार्ताहर)कमी दर्जाचे साहित्य वापरले- गोल्हारग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सा.बां.च्या वतीने येथे पुलाचे काम करण्यात आले. मात्र हा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पुलाचे बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप विजय गोल्हार यांनी केला आहे. हे काम करताना नियमांचे पालनही केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.