शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

वादळी वारे अन् गारांचा पाऊस...

By admin | Updated: May 11, 2016 00:24 IST

लोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

मोघा, नागराळ, बेंडकाळ, सालेगावला झोडपले : महाविद्यालयासह अनेकांच्या घरांचे नुकसानलोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे लोहाऱ्यातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. एकही पत्रा जागेवर राहिलेला नाही. त्याचप्रमाणे तहसील कार्यालय परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले. तर सालेगाव परिसराला गारांच्या पावसाने झोडपले. जवळपास वीस मिनिटे झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.लोहारा शहरासह परिसरातील सालेगाव, नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांत मंगळवारी दुपारी साडेचार सुमारास अचानक वादळी वारे सुरु झाले. हे वारे प्रचंड वेगाने वाहत होते. वादळी वाऱ्यासह जवळपास वीस ते पंचेविस मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण कांबळे, रसुल फकीर, सुखदेव रोडगे आदींच्या घरांवरील पत्रे उडाली. तसेच तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या महेबूब शेख यांच्या हॉटेलसमोरील पत्र्याचा निवाराही उडून गेला. तसेच याच परिसरातील काहीजणांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतामध्ये कडब्याच्या गंजी लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील गंजीही उडून गेल्या. त्यामुळे कडब्याचे मोठे नुकसान झाल्याचे सुरेश झिंगाडे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले. लोहारा शहरातील तहसील कार्यालयाच्या समोरील बाजूस असणाऱ्या शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वर्गखोल्या पत्र्याच्या शेडच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. या शेडचा एकही पत्रा जागेवर राहिला नाही. जवळपास सात ते आठ वर्गखोल्यांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. जाग्यावर राहीले ते बसण्याचे बाकडे. दरम्यान, वादळी वारे व पाऊस थांबल्यानंतर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उडून गेलेले पत्रे जमा केले. तहसील कार्यालयामध्ये सौरदिवे बसविण्यात आलेले आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील सौरदिव्यांचे खांबही उन्मळून पउले आहेत. त्याचप्रमाणे येथीलच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोरील बाजूला असलेली पानटपरीही वाऱ्यामुळे आडवी झाली. सालेगाव परिसरात मात्र वादळी वाऱ्यासोबतच गारांचा पाऊस झाला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटेच गारा बसरत होत्या. यामुळे सहदेव मातोळे, दगडू पांडुरंग बलसुरे यांच्या कडब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शिवारातील काही ठिकाणची झाडेही उन्मळून पडली आहेत. तसेच कमलाकर यादव, श्रीमंत मातोळे यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)पंधरा मिनिटे बरसल्या गारा : तहसील परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले