शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारे अन् गारांचा पाऊस...

By admin | Updated: May 11, 2016 00:24 IST

लोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

मोघा, नागराळ, बेंडकाळ, सालेगावला झोडपले : महाविद्यालयासह अनेकांच्या घरांचे नुकसानलोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे लोहाऱ्यातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. एकही पत्रा जागेवर राहिलेला नाही. त्याचप्रमाणे तहसील कार्यालय परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले. तर सालेगाव परिसराला गारांच्या पावसाने झोडपले. जवळपास वीस मिनिटे झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.लोहारा शहरासह परिसरातील सालेगाव, नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांत मंगळवारी दुपारी साडेचार सुमारास अचानक वादळी वारे सुरु झाले. हे वारे प्रचंड वेगाने वाहत होते. वादळी वाऱ्यासह जवळपास वीस ते पंचेविस मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण कांबळे, रसुल फकीर, सुखदेव रोडगे आदींच्या घरांवरील पत्रे उडाली. तसेच तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या महेबूब शेख यांच्या हॉटेलसमोरील पत्र्याचा निवाराही उडून गेला. तसेच याच परिसरातील काहीजणांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतामध्ये कडब्याच्या गंजी लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील गंजीही उडून गेल्या. त्यामुळे कडब्याचे मोठे नुकसान झाल्याचे सुरेश झिंगाडे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले. लोहारा शहरातील तहसील कार्यालयाच्या समोरील बाजूस असणाऱ्या शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वर्गखोल्या पत्र्याच्या शेडच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. या शेडचा एकही पत्रा जागेवर राहिला नाही. जवळपास सात ते आठ वर्गखोल्यांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. जाग्यावर राहीले ते बसण्याचे बाकडे. दरम्यान, वादळी वारे व पाऊस थांबल्यानंतर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उडून गेलेले पत्रे जमा केले. तहसील कार्यालयामध्ये सौरदिवे बसविण्यात आलेले आहेत. वादळी वाऱ्यामुळे सदरील सौरदिव्यांचे खांबही उन्मळून पउले आहेत. त्याचप्रमाणे येथीलच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या समोरील बाजूला असलेली पानटपरीही वाऱ्यामुळे आडवी झाली. सालेगाव परिसरात मात्र वादळी वाऱ्यासोबतच गारांचा पाऊस झाला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटेच गारा बसरत होत्या. यामुळे सहदेव मातोळे, दगडू पांडुरंग बलसुरे यांच्या कडब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शिवारातील काही ठिकाणची झाडेही उन्मळून पडली आहेत. तसेच कमलाकर यादव, श्रीमंत मातोळे यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)पंधरा मिनिटे बरसल्या गारा : तहसील परिसरातील सौरदिव्यांचे खांब उन्मळून पडले