शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

रेल्वे, विमानातून आलेले आठ प्रवासी पॉझिटिव्ह

By | Updated: December 3, 2020 04:10 IST

औरंगाबाद : दिल्लीत कोरोना आजाराने महाभयंकर स्वरूप घेतले आहे. दररोज सात हजार रुग्ण दिल्लीत नवीन आढळत आहेत. दिल्लीहून सचखंड ...

औरंगाबाद : दिल्लीत कोरोना आजाराने महाभयंकर स्वरूप घेतले आहे. दररोज सात हजार रुग्ण दिल्लीत नवीन आढळत आहेत. दिल्लीहून सचखंड एक्सप्रेसने औरंगाबादेत आलेल्या २६७ प्रवाशांची सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल आठ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबाद शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. सोमवारी सचखंड एक्सप्रेसने शहरात २६७ प्रवासी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल आज महापालिकेला प्राप्त झाला. त्यातील आठ प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. मंगळवारी सचखंड एक्सप्रेसने १९७ प्रवासी दाखल झाले. त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी त्याचा अहवाल प्राप्त होईल. मंगळवारी चिकलठाणा विमानतळावर दिल्लीहून आलेल्या तब्बल ५१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. दिल्लीत ज्या पद्धतीने कोरोना पसरत आहे, त्यामुळे तेथील व्हायरस अत्यंत गंभीर स्वरूपाचा असू शकतो, असा अंदाज महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला. या व्हायरसने औरंगाबाद शहरात शिरकाव केल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.