शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची परीक्षा द्यावी की एमपीएससीची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:02 IST

विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार : दोन्ही परीक्षा रविवारी एकाच दिवशी ........... विजय सरवदे .................... औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ...

विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार : दोन्ही परीक्षा रविवारी एकाच दिवशी ........... विजय सरवदे ....................

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा, या दोन्ही परीक्षा २१ मार्च रोजी रविवारी एकाच दिवशी होत आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने, तर रेल्वेकडून ‘नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी’ (एनटीपीसी) घेण्यात येणारी ही परीक्षा देखील ऑनलाइन; परंतु केंद्रावरच होणार आहे. औरंगाबाद शहरातील ५९ केंद्रांवर १९ हजार ६५६ विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणार आहेत, तर ३२ हजार २०८ जागांसाठीची रेल्वेची परीक्षा आधीच जाहीर झाली आहे. विद्यार्थी या दोन्ही परीक्षांची तयारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून करीत आहेत. मात्र, ‘एमपीएससी’ने १४ मार्च रोजी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि राज्यभरात आंदोलन सुरू झाले. शेवटी शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन २१ मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही परीक्षा या २१ मार्च रोजीच होणार असल्याने परीक्षार्थींची तारांबळ उडाली आहे. या सगळ्या गोंधळात मागील दोन- तीन वर्षांपासून तयारी करणारे होतकरू, शेतकरी कुटुंबातील मुले अत्यंत बिकट परिस्थितीमधून मार्ग काढून अभ्यास करत आहेत. त्यांना एका परीक्षेची संधी गमावण्याची चिंता लागली आहे.

चौकट.....

केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत

औरंगाबादेत शनिवार व रविवार या दोन दिवशी कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे रिक्षा किंवा अन्य वाहतूक सुविधा बंद

असणार आहेत. एकीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे, शहरातील हॉटेल, दुकाने सर्व बंद असतील. विद्यार्थ्यांना दिवसभर दोन सत्रांत चहा- पाण्याविना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

चौकट...........

रेल्वेची परीक्षाही केंद्रांवरच

दुसरीकडे, दोन वर्षांपूर्वीच विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या ‘एनटीपीसी’ या परीक्षेसाठी अर्ज करून तयारी सुरू केली होती. रेल्वेची ही परीक्षा ३२ हजार २०८ जागांसाठी होत असून, ती मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने घेतली जात आहे. ही परीक्षा ऑनलाइन असली, तरी परीक्षा केंद्रावरच जाऊन द्यावी लागते. बँक किंवा अन्य ऑनलाइन परीक्षेसाठी संगणकांची सुविधा असलेल्या महाविद्यालय किंवा इन्स्टिट्यूटमध्ये या परीक्षेची केंद्रे निश्चित केली जातात.

चौक..............

आमचा गोंधळ उडाला आहे

माझी ‘एमपीएससी’च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही औरंगाबादेत हडको येथील परीक्षा केंद्रावर आहे, तर रेल्वेच्या परीक्षेसाठी जळगाव केंद्र आलेले आहे. रेल्वेची ऑनलाइन परीक्षा असली तरी ती केंद्रावर जाऊनच द्यावी लागते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे, असा आमचा गोंधळ उडाला आहे.

-जया पाटील, परीक्षार्थी विद्यार्थिनी

त्या दिवशी, तर लॉकडाऊन

राज्यसेवा पूर्वपरीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. मात्र, त्या दिवशी औरंगाबादेत लॉकडाऊन आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी रिक्षा, शहरवाहतूक बस किंवा इतर साधने उपलब्ध होतील की नाही, हे सांगता येत नाही. प्रामुख्याने परीक्षा देण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे.

-गोविंद पांचाळ, परीक्षार्थी विद्यार्थी

आता तरी परीक्षा रद्द होऊ नये

आम्ही अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून औरंगाबादेत येऊन ‘एमपीएससी’ची तयारी करत आहोत. सातत्याने राज्यसेवेची ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होत आहे. १४ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करून २१ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. आता तरी ही तारीख रद्द होऊ नये म्हणजे झाले.

-सुनील कांगुळे, परीक्षार्थी विद्यार्थी