शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

‘रहेमत की बारीश अदा फरमा’

By admin | Updated: July 19, 2015 00:27 IST

बीड : पवित्र रमजान ईद शनिवारी जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढावलेले असल्यामुळे

बीड : पवित्र रमजान ईद शनिवारी जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढावलेले असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी पावसासाठी अल्लाहकडे ‘रहेमत की बारीश अदा फरमा’ अशी विनवणी केली. वैश्विक शांततेसाठीही दुवा मागितली.शहरातील किल्ला मैदान जामा मस्जिद, नवीन इदगाह बालेपीर येथे मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी नमाज अदा केली. यावेळी काझी फैजद्दुल्ला यांनी मार्गदर्शन केले. मर्कज मस्जिद, इस्लामपुरा इदगाह, दर्गाह मस्जिद बालेपीर, जामा महेबूबिया मस्जिद शाहूनगर, कादरपाशा मस्जिद जुना बाजार, केजीएन मस्जिद शहेंशाहनगर, दर्गाह शहेंशाहवली मस्जिद आदी ठिकाणी नमाज अदा करून दुवा मागण्यात आली.यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपअधीक्षक गणेश गावडे, रा. काँ. जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, माजी आ. राजेंद्र जगताप, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, प्रा. सुशीला मोराळे, बाबूराव दुधाळ, डॉ. योगेश क्षीरसागर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, सहायक निरीक्षक एम. ए. सय्यद, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुभाषचंद्र सारडा आदींनी शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आ. सय्यद सलीम, सिराजोद्दीन देशमुख, अ‍ॅड. शेख शफीक, खालेक पेंटर, मोईन मास्टर, शेख फारूक, उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, शेख मुसा, शाहेद पटेल, अ‍ॅड. इरफान बागवान आदी उपस्थित होते.गेवराईतही पावसासाठी दुवायेथील ईदगाह मैदानावर ईदनिमित्त नमाज अदा करून पाऊस व शांततेसाठी दुवा मागितली. यावेळी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती. आ. अ‍ॅड. लक्ष्मण पवार, आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष महेश दाभाडे, जि. प. सदस्य युधाजित पंडित, उपअधीक्षक राजकुमार चाफेकर, निरीक्षक सुरेंद्र गंधम, नायब तहसीलदार कल्याण जगरवाल, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, शेख जमादार, याहिया खान, रोहित पंडित, हन्नान इनामदार यांची उपस्थिती होती. उमापूर, चकलांबा, तलवाडा येथेही ईद साजरी करण्यात आली.धारूर, शिरूर, पाटोदा, परळी, अंबाजोगाई, वडवणी, केज, माजलगाव, आष्टी येथेही ईद उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांना सर्व जातीधर्माच्या लोकांनी शुभेच्छा दिल्या.मुस्लिम बांधवांनी घरोघर गोडधोड पदार्थ, शिरखुर्मा, गुलगुले तयार केले होते. नवीन पोषाख परिधान करून लहानांपासून मोठ्यापर्यंत एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देत होते. (प्रतिनिधी)