शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

प्रवेशासाठी अडचणींची शर्यत

By admin | Updated: July 11, 2017 00:29 IST

औरंगाबाद : अडथळ्यांची शर्यत पार करताच यंदा शिक्षण विभागाला अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी मार्ग काढावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अडथळ्यांची शर्यत पार करताच यंदा शिक्षण विभागाला अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी मार्ग काढावा लागत आहे. शिक्षण विभागाचे सर्व्हर हँग झाल्यामुळे सोमवारी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप झाला. यावर्षी पहिल्यांदाच औरंगाबाद महापालिका क्षेत्रात इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली; पण सुरुवातीला काही दिवस सतत सर्व्हर हँग होत राहिल्यामुळे विद्यार्थी व पालकांना आॅनलाइन नोंदणीसाठी अडचणींचा सामना करावा लागला. पालकांची ही अडचण लक्षात येत शिक्षण संचालनालयाने आॅनलाइन नोंदणीसाठी २९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली व प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. शहरातील जवळपास ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जवळपास २२ ते २३ हजार प्रवेश क्षमता असली तरी प्रत्यक्षात अकरावीच्या प्रवेशासाठी १९ हजार ३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १ जुलैपासून ‘कोटा’ पद्धतीनुसार प्रवेश सुरू झाले. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वसाधारण प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. पण, रात्री उशिरापर्यंत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून यादी जाहीर होऊ शकली नाही. उद्या ११ ते १३ जुलैपर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीनुसार वाटप करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. १४ आणि १५ जुलैपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणाला जर महाविद्यालय किंवा विद्याशाखांचा पसंतीक्रम बदलावा वाटला तर ते बदलू शकतात. ज्यांना पसंतीक्रम बदलण्याची इच्छा नसेल, त्यांची प्रवेशासाठी पुढील गुणवत्ता यादीत नावे जाहीर होतील, असे शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी सांगितले.