शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

रबीला हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ कमी पाण्यावर उत्पादन देणारे हरभरा पीक असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली आहे़रब्बी हंगामामध्ये लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे सरासरी क्षेत्र १,८७,१६७ क्षेत्रापैकी सहा तालुक्यातील ४,१४७ हेक्टरवर रबी पिकाची पेरणी झाली़ यामध्ये ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई आदी पिकांचा समावेश आहे़ लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभरा, ७५ हेक्टरवर ज्वारी व १२ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी झाली़ औसा तालुक्यामध्ये २० हेक्टरवर ज्वारी, ३० हेक्टरवर मका, २१० हेक्टरवर हरभरा, ५ हेक्टरवर करडई, २ हेक्टरवर जवस, ५ हेक्टरवर सुर्यफुल व ३ हेक्टरवर इतर पिकाची पेरणी करण्यात आली़ चाकूर तालुक्यात ६९ हेक्टरवर ज्वारी, २६ हेक्टरवर मका, २ हेक्टरवर गहू, १२ हेक्टरवर करडई याप्रमाणात रबी पिकाची परेणी करण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, २५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई व ७ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करण्यात आली़ शिरुर अनंतपाळ तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, १५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई तर ९ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करतण्यात आली़ रेणापूर तालुक्यात ५९० हेक्टरवर ज्वारी २,१२६ हेक्टरवर हरभरा, ७७१ हेक्टरवर करडई या प्रमाणात ४,१४७ हेक्टर क्षेत्रावर रबीची पेरणी करण्यात आली़ यामध्ये ज्वारी, गहु, सुर्यफुल, करडई, हरभरा आदी पिकामध्ये ३६९ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ तर जळकोट, अहमदपूर, देवणी व उदगीर या तालुक्यात मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अद्यापही पेरण्या निरंक आहेत़ (प्रतिनिधी)रबी हंगामामध्ये अल्पशा पावसावर ६ तालुक्यात ४१४७ हेक्टरवर पेरण्या झाल्या़ परंतु उर्वरित ४ तालुक्यातील पेरण्या मात्र निरंक आहेत़ परंतु पेरणीचा कालावधी १५ नोव्हेंबर पर्यंतचा असल्याने शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ यासाठी खरीप व रबी हंगामासाठी १०० मिलीमिटर पावसाची गरज आहे़रबी हंगामात ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई, मका व इतर कडधान्य पिकामध्ये हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक झाला आहे़ यामध्ये औसा तालुक्यात २१०, चाकूर तालुक्यात २३१, निलंगा तालुक्यात २५, शिरुर अनंतपाळ तालुक्यात २५, लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली़ तर रेणापूर तालुक्यात २१२६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाल्याने रेणापूर तालुक्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाल्याचे समोर आले आहे़