शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

रबीला हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली

लातूर : यावर्षी पावसाने दगा दिला असला तरी जिल्ह्यातील काही भागात रबी हंगामात पेरण्या झाल्या आहेत़ एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैैकी ३ हजार ६९ हेक्टर्सवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ कमी पाण्यावर उत्पादन देणारे हरभरा पीक असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली आहे़रब्बी हंगामामध्ये लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे सरासरी क्षेत्र १,८७,१६७ क्षेत्रापैकी सहा तालुक्यातील ४,१४७ हेक्टरवर रबी पिकाची पेरणी झाली़ यामध्ये ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई आदी पिकांचा समावेश आहे़ लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभरा, ७५ हेक्टरवर ज्वारी व १२ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी झाली़ औसा तालुक्यामध्ये २० हेक्टरवर ज्वारी, ३० हेक्टरवर मका, २१० हेक्टरवर हरभरा, ५ हेक्टरवर करडई, २ हेक्टरवर जवस, ५ हेक्टरवर सुर्यफुल व ३ हेक्टरवर इतर पिकाची पेरणी करण्यात आली़ चाकूर तालुक्यात ६९ हेक्टरवर ज्वारी, २६ हेक्टरवर मका, २ हेक्टरवर गहू, १२ हेक्टरवर करडई याप्रमाणात रबी पिकाची परेणी करण्यात आली आहे़ निलंगा तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, २५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई व ७ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करण्यात आली़ शिरुर अनंतपाळ तालुक्यात १८ हेक्टरवर ज्वारी, १० हेक्टरवर मका, १५ हेक्टरवर हरभरा, १७ हेक्टरवर करडई तर ९ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी करतण्यात आली़ रेणापूर तालुक्यात ५९० हेक्टरवर ज्वारी २,१२६ हेक्टरवर हरभरा, ७७१ हेक्टरवर करडई या प्रमाणात ४,१४७ हेक्टर क्षेत्रावर रबीची पेरणी करण्यात आली़ यामध्ये ज्वारी, गहु, सुर्यफुल, करडई, हरभरा आदी पिकामध्ये ३६९ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ तर जळकोट, अहमदपूर, देवणी व उदगीर या तालुक्यात मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अद्यापही पेरण्या निरंक आहेत़ (प्रतिनिधी)रबी हंगामामध्ये अल्पशा पावसावर ६ तालुक्यात ४१४७ हेक्टरवर पेरण्या झाल्या़ परंतु उर्वरित ४ तालुक्यातील पेरण्या मात्र निरंक आहेत़ परंतु पेरणीचा कालावधी १५ नोव्हेंबर पर्यंतचा असल्याने शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ यासाठी खरीप व रबी हंगामासाठी १०० मिलीमिटर पावसाची गरज आहे़रबी हंगामात ज्वारी, गहू, सुर्यफुल, करडई, मका व इतर कडधान्य पिकामध्ये हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक झाला आहे़ यामध्ये औसा तालुक्यात २१०, चाकूर तालुक्यात २३१, निलंगा तालुक्यात २५, शिरुर अनंतपाळ तालुक्यात २५, लातूर तालुक्यात ४७७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली़ तर रेणापूर तालुक्यात २१२६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाल्याने रेणापूर तालुक्यात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाल्याचे समोर आले आहे़