शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रबी, खरीप हंगामासाठी १४३८ दलघमी पाणी देणार

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा १५० टक्के पाऊस झाला. परिणामी विभागातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असून, त्याचा फायदा ...

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा १५० टक्के पाऊस झाला. परिणामी विभागातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असून, त्याचा फायदा सिंचनाला होणार आहे. आगामी रबी आणि खरीप हंगामात विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठे प्रकल्पावरील सिंचन पाणी नियोजनासाठी प्रथम पाणीपाळी राबविण्याच्या दृष्टीने १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याने सोडण्यात येणार आहे.

कालवा सल्लागार समितीची २०२०-२१ ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करून प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना अध्यक्ष चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठ्या प्रकल्पावरील रबी प्रथम आवर्तनासाठी मान्यता दिली. बैठकीत प्रकल्पावरील उपलब्ध पाण्याचे रबी व उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबाबत अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सादरीकरण केले.

जायकवाडी प्रकल्पातील नियोजन असे

जायकवाडी प्रकल्पाचे दोन्ही कालव्यावरील लाभक्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे. १ लाख २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी १७० दलघमी पाणी देण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही कालव्यावर १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर व ५३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे. त्यासाठी ११४८ दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे.

नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून इतके पाणी देणार

नांदूर मधमेश्वर प्रकल्पावरील लाभक्षेत्र हे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यात मुकणे, भाम, भावली व वाकी धरणांत १०० टक्के पाणीसाठा आहे. बाष्पीभवन, घरगुती व औद्योगिक पाणीवापर, धरणाखालील बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतर उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे २ आवर्तन देणे प्रस्तावित आहे. धरणांतून १३८ दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे.

लोअर दुधनातून इतके पाणी

लोअर दुधना धरणात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. बाष्पीभवन होऊन उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे प्रत्येकी ३ पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. यात १५ हजार १०० व ५ हजार ९२० हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित असून त्यात १५२ दलघमी पाणीवापर होईल.