शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

विजेच्या समस्येमुळे रबी हंगाम धोक्यात

By admin | Updated: January 1, 2017 23:56 IST

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे.

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे. परिणारमी या ३३ केव्हीमधून मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या वाढल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. वीज जोडणीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.राणीउंचेगाव येथील ३३ केव्हीच्या उपकेंद्राला अंबड येथील १३२ केव्ही मधून वीज पुरवठा होत आहे. परंतु अंबड १३२ केव्हीमधून गोलापांगरी, शेवगा आणि हिस्वन अशा तीन ३३ केव्हीला वीज पुरवठा होऊन शेवटी राणीउंचेगाव ३३ केव्हीला वीजपुरवठा होत असल्याने या ३३ केव्हीला विजेचा पुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. यामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. शेतीचे कृषीपंप कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे चालत नाही. रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत असल्याने रबी हंगााम धोक्यात आला आहे.राणीउंचेगाव ३३ केव्ही अंतर्गत परिसरातील तळेगाव, मानेपुरी, राठी अंतरवाली, चापडगाव, शिंदे वडगाव, पानेवाडी, गुरूपिंप्री, भुतेगाव, दाई अंतरवाली, शेवगळ, सरफगव्हाण, निपानी पिंपळगाव, मंगू जळगाव, रवना, कृष्णनगर, मुढेगाव, पानेगाव, आवलगाव आदी २२ गावे जोडण्यात आली आहे.राणीउंचेगाव ३३ केव्हीमधून क्षमतेपेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा होत असल्याने विजेच्या अनेक समस्या वाढल्या. यामुळे भुतेगाव येथे ३३ केव्ही दुसरे उपकेंद्र मागील एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. यामुळे राणीउंचेगाव ३३ केव्हीमधील भुतेगाव, पानेवाडी, दाई अंतरवाली आणि कारला परिसराचा काही भाग भुतेगावला जोडण्यात आला भुतेगावला घनसावंगी १३२ केव्हीमधून वीज पुरवठा जोडला आहे. घनसावंगी १३२ केव्हीमधून राणीउंचेगाव लाही वीज पुरवठा जोडला जाणार आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी फक्त ७ पोलचे अंतर आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भुतेगाव ३३ केव्हीच्या उदघाटन कार्यक्रमात वीज वितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी राणीउंचेगावला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून पाच दिवसामध्ये वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, असे शेतकऱ्यांना सांगितले. परंतु हा वीजपुरवठा अद्यापही जोडला गेला नाही. यामुळे शेतकरी विजेच्या समस्येने हैराण झाले आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)