शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या समस्येमुळे रबी हंगाम धोक्यात

By admin | Updated: January 1, 2017 23:56 IST

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे.

राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून जोडल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याचे काम लालफितीत अडकले आहे. परिणारमी या ३३ केव्हीमधून मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या वाढल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. वीज जोडणीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.राणीउंचेगाव येथील ३३ केव्हीच्या उपकेंद्राला अंबड येथील १३२ केव्ही मधून वीज पुरवठा होत आहे. परंतु अंबड १३२ केव्हीमधून गोलापांगरी, शेवगा आणि हिस्वन अशा तीन ३३ केव्हीला वीज पुरवठा होऊन शेवटी राणीउंचेगाव ३३ केव्हीला वीजपुरवठा होत असल्याने या ३३ केव्हीला विजेचा पुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. यामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. शेतीचे कृषीपंप कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे चालत नाही. रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत असल्याने रबी हंगााम धोक्यात आला आहे.राणीउंचेगाव ३३ केव्ही अंतर्गत परिसरातील तळेगाव, मानेपुरी, राठी अंतरवाली, चापडगाव, शिंदे वडगाव, पानेवाडी, गुरूपिंप्री, भुतेगाव, दाई अंतरवाली, शेवगळ, सरफगव्हाण, निपानी पिंपळगाव, मंगू जळगाव, रवना, कृष्णनगर, मुढेगाव, पानेगाव, आवलगाव आदी २२ गावे जोडण्यात आली आहे.राणीउंचेगाव ३३ केव्हीमधून क्षमतेपेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा होत असल्याने विजेच्या अनेक समस्या वाढल्या. यामुळे भुतेगाव येथे ३३ केव्ही दुसरे उपकेंद्र मागील एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले. यामुळे राणीउंचेगाव ३३ केव्हीमधील भुतेगाव, पानेवाडी, दाई अंतरवाली आणि कारला परिसराचा काही भाग भुतेगावला जोडण्यात आला भुतेगावला घनसावंगी १३२ केव्हीमधून वीज पुरवठा जोडला आहे. घनसावंगी १३२ केव्हीमधून राणीउंचेगाव लाही वीज पुरवठा जोडला जाणार आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी फक्त ७ पोलचे अंतर आहे. येथून वीज पुरवठा जोडण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भुतेगाव ३३ केव्हीच्या उदघाटन कार्यक्रमात वीज वितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी राणीउंचेगावला घनसावंगी येथील १३२ केव्हीमधून पाच दिवसामध्ये वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, असे शेतकऱ्यांना सांगितले. परंतु हा वीजपुरवठा अद्यापही जोडला गेला नाही. यामुळे शेतकरी विजेच्या समस्येने हैराण झाले आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)