शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

रबी हंगाम रोगराईच्या विळख्यात !

By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST

उमरगा : तालुक्यात चार-पाच दिवसांपासून वातवरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना फटका बसत असून सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.

उमरगा : तालुक्यात चार-पाच दिवसांपासून वातवरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना फटका बसत असून सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.अख्ख्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरीच्या अवघा ४४९ मिमी पाऊस झाला. अवेळी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामही शेतकऱ्याच्या हातचा गेला. अत्यल्प पावसावर सुमारे ३५ हजार हेक्टरवर पेरणी केली. यापैकी १२ हजार हेक्टरवर रबी ज्वारी तर १३ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात करडई, गहू आदी पिके आहेत. असे असतानाच मागील चार-पाच दिवसांपासून वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांमुळे पिकांवर आता विविध प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. (वार्ताहर)करडईचे पीक सद्या फुलोऱ्यात आहे. याही पिकावर आता मावा रोग पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिकाची अपेक्षित वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगतात. त्याचप्रमाणे काही भागात फुलोऱ्यात आलेल्या करडईची फुले गळू लागली आहेत.आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस व हवामानातील कमी झालेली उष्णता या एकूणच परिस्थितीचा ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे ज्वारीची पाने पिवळी पडून वाढ खुंटण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीवर १० लिटर पाण्यात १० मिली रोगर व २ टक्के युरीयाची फवारणी करणे आवश्यक झाले आहे. तसेच हरभऱ्यावर पडणाऱ्या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात इकॅलॅक्स २५ मिली व ५ टक्के लिंबुळी आर्क अशी फवारणी करावी. करडई पिकावरील मावा व इतर कीड नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी फवारण्या कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हणमंत गोरे यांनी केले आहे.ज्वारीवर ‘मावा’तालुक्यातील मुरुम, आलूर, अचलेर, नारंगवाडी, मुळज, तुरोरी या भागातील शेतकऱ्यांनी प्राधान्याने रबी ज्वारीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. विंधन विहिरी व साठवण तलावातील उपलब्ध पाण्यावर ज्वारी जोपासली जात असली तरी पाच दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने ढगाळ वातावरणात धुई पडून पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हरभरा पिकावर ‘घाटे अळी’उशिराने पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ज्वारीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १३ हजार हेक्टवर हरभऱ्याची पेरणी केली. या पिकाची बऱ्यापैकी वाढ झालेली असतानाच ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.