शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रब्बी पिकालाही करावी लागत आहे कीटनाशकांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:03 IST

लाडसावंगी : मागील दोन वर्षांपासून सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था होत असल्याने, रबी पिके चांगली येत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे या ...

लाडसावंगी : मागील दोन वर्षांपासून सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था होत असल्याने, रबी पिके चांगली येत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे या पिकांवरही कीटकनाशक फवारणीचा खर्च करावा लागत असल्याने अर्थकारण बिघडत असून, शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले आहे.

एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून पाऊस चांगला होत आहे. यामुळे रब्बी पिकाची विक्रमी पेर झाली. यंदा तर रब्बीचा गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिके घेऊन शेतकरी संधीचे सोने करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात बदल होत असून, यामुळे या पिकांवर अळी व किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. यामुळे ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटनाशकांची फवारणी करावी लागत आहे. मात्र, तरीही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गव्हावर मावाचा प्रादुर्भाव होत असल्याने, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोनदा कीटनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत.

चौकट

अडचणी वाढल्या

एकीकडे रब्बी पिके म्हणजे खर्च नसलेली पिके समजली जातात. यात थंडी व उन्हामुळे पिकांवर रोग पडत नाही. केवळ पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याचे आतापर्यंत समज होता. मात्र, या पिकांवर आता किडी व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या अगोदरच खरीपाची अतिपावसाने वाट लागलेली असताना, रब्बीचीही पिके धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांंच्या अडचणी वाढल्या आहेत.

फोटो कॅप्शन : १) लाडसावंगी परिसरात हरभरा पिकावर कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी. २) लाडसावंगी परिसरात मका पिकावर लष्करी अळीने कोवळे पिक असे खाऊन टाकत आहे.

020221\1612260069102_1.jpg~020221\1612260069100_1.jpg

लाडसावंगी परिसरात हरभरा पिकावर किटकनाशक फवारणी करताना शेतकरी.

 लाडसावंगी परिसरात मका पिकावर लष्करी अळीने कोवळे पिक असे खाऊन टाकत आहे.