शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

रब्बी पिकालाही करावी लागत आहे कीटनाशकांची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:03 IST

लाडसावंगी : मागील दोन वर्षांपासून सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था होत असल्याने, रबी पिके चांगली येत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे या ...

लाडसावंगी : मागील दोन वर्षांपासून सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था होत असल्याने, रबी पिके चांगली येत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे या पिकांवरही कीटकनाशक फवारणीचा खर्च करावा लागत असल्याने अर्थकारण बिघडत असून, शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले आहे.

एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून पाऊस चांगला होत आहे. यामुळे रब्बी पिकाची विक्रमी पेर झाली. यंदा तर रब्बीचा गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिके घेऊन शेतकरी संधीचे सोने करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात बदल होत असून, यामुळे या पिकांवर अळी व किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. यामुळे ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटनाशकांची फवारणी करावी लागत आहे. मात्र, तरीही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गव्हावर मावाचा प्रादुर्भाव होत असल्याने, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोनदा कीटनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत.

चौकट

अडचणी वाढल्या

एकीकडे रब्बी पिके म्हणजे खर्च नसलेली पिके समजली जातात. यात थंडी व उन्हामुळे पिकांवर रोग पडत नाही. केवळ पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याचे आतापर्यंत समज होता. मात्र, या पिकांवर आता किडी व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या अगोदरच खरीपाची अतिपावसाने वाट लागलेली असताना, रब्बीचीही पिके धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांंच्या अडचणी वाढल्या आहेत.

फोटो कॅप्शन : १) लाडसावंगी परिसरात हरभरा पिकावर कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी. २) लाडसावंगी परिसरात मका पिकावर लष्करी अळीने कोवळे पिक असे खाऊन टाकत आहे.

020221\1612260069102_1.jpg~020221\1612260069100_1.jpg

लाडसावंगी परिसरात हरभरा पिकावर किटकनाशक फवारणी करताना शेतकरी.

 लाडसावंगी परिसरात मका पिकावर लष्करी अळीने कोवळे पिक असे खाऊन टाकत आहे.