शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

रबी क्षेत्र वाढणार दुपटीने

By admin | Updated: September 17, 2015 00:32 IST

राजेश खराडे , बीड जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी पेरणीची पुर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

राजेश खराडे , बीडजिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी पेरणीची पुर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७९ हजार हेक्टर ऐवढे आहे. खरीपाच्या पिकांची मोड झाल्याने रबी हंगामात २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामावरच अवलंबून असते. गेल्या दोन वर्षापासून खरीपाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कापूस हे मुख्य पिक असून यामधूनच अधिकचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस असतो. गतवर्षी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. तर यंदा खरीपात पावसाने ओढ दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या जोरावर केवळ दीड महिन्याच्या कालावधीत सरासरीइतका खरीपाचा पेरा झाला होता. मात्र पावसाने ओढ दिल्याने पिके उगवण्याच्या आगोदरच मोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. अद्यापपर्यंत केवळ २५ दिवस पाऊस झाला असून ७५ दिवस हे निरंक गेले आहेत. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २ लाख ३४ हजार हेक्टरवरील खरीपातील पिकांची मोडणी करण्यात आली होती. मात्र उर्वरीत पेऱ्यातून उत्पादन तर सोडाच जनावरांसाठी साधा चारा देखील झाला नाही. त्यामुळे खरीपातून उत्पादन तर सोडाच मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४०९ कोटी रुपायांचा फटका बसला आहे. आर्थिक फटका व खरीपाच्या मोकळ्या क्षेत्रातून उत्पादन घेण्याच्या उद्देशाने जवळपास अडीच लाख हेक्टर रब्बी क्षेत्र वाढणार असून रब्बी ज्वारी, गहू या पिक लागवडीत वाढ होणार असल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात येत आहे. गतवर्षी रब्बीची २ लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. चाऱ्याचाही उद्देशरब्बीचे नुकसान व पावसाळ्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने जिल्ह्यात चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे रब्बीतून उत्पादनाबरोबर चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लावण्याचा दुहेरी हेतू बाळगला जात आहे. सध्या वैरण विकास प्रकल्पाअंतर्गत सुमारे १३८०० हेक्टरवर पुरेल ऐवढे बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आले आहे. नियोजन कागदावरचरब्बी पेरणी लायक पाऊस नसतानाही पिक निहाय लागणारे बियाणे व रासायनिक खतांचे नयोजन करण्यात आला असल्याचा निर्वाळा कृषी विभागाने दिला आहे.