शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रबी क्षेत्र वाढणार दुपटीने

By admin | Updated: September 17, 2015 00:32 IST

राजेश खराडे , बीड जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी पेरणीची पुर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

राजेश खराडे , बीडजिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी पेरणीची पुर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७९ हजार हेक्टर ऐवढे आहे. खरीपाच्या पिकांची मोड झाल्याने रबी हंगामात २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामावरच अवलंबून असते. गेल्या दोन वर्षापासून खरीपाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कापूस हे मुख्य पिक असून यामधूनच अधिकचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा मानस असतो. गतवर्षी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे नुकसान झाले होते. तर यंदा खरीपात पावसाने ओढ दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या जोरावर केवळ दीड महिन्याच्या कालावधीत सरासरीइतका खरीपाचा पेरा झाला होता. मात्र पावसाने ओढ दिल्याने पिके उगवण्याच्या आगोदरच मोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. अद्यापपर्यंत केवळ २५ दिवस पाऊस झाला असून ७५ दिवस हे निरंक गेले आहेत. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत २ लाख ३४ हजार हेक्टरवरील खरीपातील पिकांची मोडणी करण्यात आली होती. मात्र उर्वरीत पेऱ्यातून उत्पादन तर सोडाच जनावरांसाठी साधा चारा देखील झाला नाही. त्यामुळे खरीपातून उत्पादन तर सोडाच मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४०९ कोटी रुपायांचा फटका बसला आहे. आर्थिक फटका व खरीपाच्या मोकळ्या क्षेत्रातून उत्पादन घेण्याच्या उद्देशाने जवळपास अडीच लाख हेक्टर रब्बी क्षेत्र वाढणार असून रब्बी ज्वारी, गहू या पिक लागवडीत वाढ होणार असल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात येत आहे. गतवर्षी रब्बीची २ लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. चाऱ्याचाही उद्देशरब्बीचे नुकसान व पावसाळ्यात समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने जिल्ह्यात चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे रब्बीतून उत्पादनाबरोबर चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लावण्याचा दुहेरी हेतू बाळगला जात आहे. सध्या वैरण विकास प्रकल्पाअंतर्गत सुमारे १३८०० हेक्टरवर पुरेल ऐवढे बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आले आहे. नियोजन कागदावरचरब्बी पेरणी लायक पाऊस नसतानाही पिक निहाय लागणारे बियाणे व रासायनिक खतांचे नयोजन करण्यात आला असल्याचा निर्वाळा कृषी विभागाने दिला आहे.