शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

लिपिकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार- टोपे

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू,

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या विभागीय मेळाव्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर होत्या. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश दाभाडकर, सचिव बापूसाहेब कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुुख, जिल्हाध्यक्ष रामधन कळंबे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पालकमंत्री टोपे आपल्या भाषणात म्हणाले की, लिपिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅबिनेट बैठकीत आपण आग्रही भूमिका घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना सुधारित आकृतीबंध लागू व्हावा, यासाठी आपण अर्थमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. वेतनाच्या प्रश्नासह अन्य प्रश्नही मार्गी लावू, असे आश्वासन टोपे यांनी यावेळी दिले.याप्रसंगी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, दाभाडकर, कुलकर्णी यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक रामधन कळंबे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोडले यांनी केले. मेळाव्यात विविध सत्रात मराठवाड्यातून आलेल्या जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने विविध प्रश्नांबाबत शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यासंबंधी माहितीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून दिली. त्याचप्रमाणे आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. या मेळाव्यास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मेळाव्याची सांगता सायंकाळी झाली. (प्रतिनिधी) $ि$िलपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यातून आपल्या भाषणातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, असा सूर लावला. गेल्या अनेक दिवसांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. प्रत्यक्षात प्रश्न दूर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या मेळाव्यास मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीही जालन्यात विभागीय मेळावा घेण्यात आला होता.