शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लिपिकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार- टोपे

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू,

जालना : जिल्हा परिषदेतील लिपिक हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक असून त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या विभागीय मेळाव्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर होत्या. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश दाभाडकर, सचिव बापूसाहेब कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुुख, जिल्हाध्यक्ष रामधन कळंबे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पालकमंत्री टोपे आपल्या भाषणात म्हणाले की, लिपिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कॅबिनेट बैठकीत आपण आग्रही भूमिका घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना सुधारित आकृतीबंध लागू व्हावा, यासाठी आपण अर्थमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. वेतनाच्या प्रश्नासह अन्य प्रश्नही मार्गी लावू, असे आश्वासन टोपे यांनी यावेळी दिले.याप्रसंगी जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, दाभाडकर, कुलकर्णी यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक रामधन कळंबे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोडले यांनी केले. मेळाव्यात विविध सत्रात मराठवाड्यातून आलेल्या जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने विविध प्रश्नांबाबत शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यासंबंधी माहितीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून दिली. त्याचप्रमाणे आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. या मेळाव्यास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मेळाव्याची सांगता सायंकाळी झाली. (प्रतिनिधी) $ि$िलपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यातून आपल्या भाषणातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, असा सूर लावला. गेल्या अनेक दिवसांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. प्रत्यक्षात प्रश्न दूर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या मेळाव्यास मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीही जालन्यात विभागीय मेळावा घेण्यात आला होता.