शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

कडबा महागल्याने सव्वाआठ लाख गुरांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: July 14, 2015 00:51 IST

राजेश खराडे , बीड पावसाने ओढ दिल्याने आठ दिवसाच्या कालावधीतच कडब्याचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांकडून लागेल तेवढ्याच कडबा चाऱ्याची खरेदी केली जात

राजेश खराडे , बीड पावसाने ओढ दिल्याने आठ दिवसाच्या कालावधीतच कडब्याचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांकडून लागेल तेवढ्याच कडबा चाऱ्याची खरेदी केली जात आहे. हिरवा चारा तर दुरापास्तच झाला आहे. ऐन पावसाळ्यातही हिरवा चारा तर सोडाच वाळलेला कडबा देखील मिळने मुश्किल झाले आहे. आठ दिवसापुर्वी १४०० रुपये शेकडा कडब्याचे दर होते. सबंध आठवडा जिल्ह्यात पावसाचा थेंबही न पडल्याने भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी कडबा खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. परिणामी आवक घटल्याने कडब्याचे दर सध्या अडीच ते तीन हजाराच्या घरात गेले आहेत. जिल्ह्यातून तर कोणत्याच चाऱ्याची आवक होत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना उस्मानाबाद, भूम, परंडा तर सोलापूर, बार्शी या ठिकाणाहून आयात करावी लागत असल्याचे येथील व्यापाऱ्याने सांगितले. दिवसाला येथील बाजारपेठेत ३ ते ४ हजार कडब्याची आवक होत आहे. मात्र ठोक व्यवहार तर बंद झाले आहेत. शेतकरीही लागेल तसे कडब्याची खरेदी करीत आहे. हिरव्या चाऱ्याची तर बाजारपेठच बंद झाली आहे. चाराच शिल्लक नाही जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातून चाऱ्याची आवक होत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना इतर जिल्ह्यातून मागणी करावी लागत आहे. वाहतूकीस होणाऱ्या खर्चाचा परिणाम देखील चाऱ्याच्या दरावर झाला आहे. वाहतूकीच्या खर्चाचा परिणाम पावसाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध असतो. मात्र यंदा भयावह परिस्थती निर्माण झाल्याने पावसाळ्यातही चारा नसल्याने जनावर दावनीला बांधण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरे बांधून असल्याने दिवसाला एका जनावरास ५ ते ६ कडब्याच्या पेंड्या लागत आहेत. पाऊस पडेल या आशेने आठवडाभर पुरेल एवढ्याच चाऱ्याची खरेदी करीत असल्याचे शेतकरी अशोक गर्जे यांनी सांगितले.