शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

बाजार समितीच्या सभेवरच प्रश्नचिन्ह

By admin | Updated: January 12, 2016 23:43 IST

हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२ जानेवारी रोजी झालेल्या सभेवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२ जानेवारी रोजी झालेल्या सभेवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही सदस्यांनी या सभेत झालेल्या सर्व ठरावांना विरोध असल्याचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना दिले आहे. हिंगोलीची बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल ११ संचालकांनी सभेतील ठरावांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ही सभा झाली की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सभेनंतर काही वेळांनीच संचालकांनी विरोध सुरू केला. यात ठराव लिहिण्यापूर्वीच काही संचालकांनी अनावधानाने सह्या केल्याने ते आम्हाला मान्य नाही. हे प्रोसिडिंग ग्राह्य धरू नये, असे पत्र सचिवांना राजेश पाटील, संजय कावरखे, रामचंद्र वैद्य, प्रशांत सोनी, शंकर पाटील, दत्तराव जाधव, शे.बुऱ्हाण, प्रभाकर शेळके, मीनाताई कावरखे, किसन लक्ष्मण नेव्हल, लिंबाजी मुटकुळे या संचालकांनी दिले आहे. त्यानंतर उपासभापती दत्तराव जाधव यांनी सचिवांकडे उपस्थितीपट व प्रोसिडिंग मागितली असता ती दिली नसल्याची तक्रार केली आहे. सचिव जब्बार पटेल यांनी तर सभापती रामेश्वर शिंदे हे प्रोसिडिंग, उपस्थितीपट व प्रवास भत्ता रजिस्टर घेवून गेले, सहायक निबंधकही मागणीसाठी आले असता ते त्यांच्याकडेच होते, असा जबाब दिला. तर तीननंतर ते माझ्याकडे आल्याचे पटेल यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे बाजार समितीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संचालकांचा नूर काही वेगळेच सांगून जात असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)