शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पुलांबाबत ‘पीडब्ल्यूडी’ अलर्ट

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मुंबई- गोवा महामार्गावरील सावित्री नदीला पूर आल्यामुळे पूल वाहून गेला. त्या दुर्घटनेत दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या

औरंगाबाद : मुंबई- गोवा महामार्गावरील सावित्री नदीला पूर आल्यामुळे पूल वाहून गेला. त्या दुर्घटनेत दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या असून, मराठवाड्यातील सर्व जुन्या पुलांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता एम. एम. सुरकटवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. विभागातील ११ पूल जुने असले तरी त्यांची ‘कॅरिंग कपॅसिटी’ चांगली आहे. त्या सर्व पुलांच्या आॅडिटबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पुलांवरील वाहतुकीचे नियमित इन्स्पेक्शन होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातून साधारणत: ३०० कि़ मी. गोदावरीचे पात्र जाते. हे पात्र जोडण्यासाठी बांधण्यात आलेले पूल बांधकाम विभागाने निर्माण केले आहेत. नाशिकमधून गोदावरी, काश्यपी, गौतमी या नद्यांचा उगम असल्यामुळे गंगापूर धरणाखालील गोदापात्राला दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर आला आहे. त्या पुराचे पाणी गोदावरीतील पात्रातून नांदूर-मधमेश्वरमार्गे जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले आहे. जायकवाडीखालील गोदावरी पात्राच्या अंतरात पावसाचा जोर नसल्यामुळे पुलांचे नुकसान होईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. कायगाव, शहागड येथील जुन्या पुलांचे साधारणत: १० वर्षांपूर्वी बांधकाम झाले आहे.पैठणनजीकच्या आपेगाव येथील पूल मागेच खचला आहे. त्या पुलाला पर्याय असल्यामुळे तो अजून दुरुस्त झालेला नाही. विभागातील बहुतांश जिल्हा मार्ग खड्डेमय झाले आहेत. पावसाळ्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. २२०० कोटींच्या आसपास त्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी लागतील, असा अंदाज आहे.मुख्य अभियंता म्हणाले....महाडमधील दुर्घटना गंभीर आहे. तो पूल १०० वर्षे जुना असल्याचे वृत्त आहे. मराठवाड्यात काही जुने पूल आहेत. परंतु सध्या त्या पुलांना कुठलाही धोका नाही. विभागामार्फत जिल्हा पुलांचे इन्स्पेक्शन नियमित केले जाते. तरीही विभागातील सर्व यंत्रणेला जिल्ह्यांतील महत्त्वांच्या पुलांबाबत वाहतूक आणि सद्य:स्थिती काय आहे, याची माहिती तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तरी पुलांना कुठलाही धोका नाही. कोकणात सह्याद्रीच्या रांगांमुळे पावसाचे पाणी वेगाने येते. त्यामुळे त्याचा फटका रस्ते आणि पुलांना होता. तशी परिस्थिती मराठवाड्यात नाही. तसेच पावसाचे प्रमाणही संथ आहे, असे मुख्य अभियंता सुरकटवार यांनी नमूद केले.