शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

जुन्या पुलांबाबत ‘पीडब्ल्यूडी’ अलर्ट

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मुंबई- गोवा महामार्गावरील सावित्री नदीला पूर आल्यामुळे पूल वाहून गेला. त्या दुर्घटनेत दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या

औरंगाबाद : मुंबई- गोवा महामार्गावरील सावित्री नदीला पूर आल्यामुळे पूल वाहून गेला. त्या दुर्घटनेत दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या असून, मराठवाड्यातील सर्व जुन्या पुलांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता एम. एम. सुरकटवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. विभागातील ११ पूल जुने असले तरी त्यांची ‘कॅरिंग कपॅसिटी’ चांगली आहे. त्या सर्व पुलांच्या आॅडिटबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पुलांवरील वाहतुकीचे नियमित इन्स्पेक्शन होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातून साधारणत: ३०० कि़ मी. गोदावरीचे पात्र जाते. हे पात्र जोडण्यासाठी बांधण्यात आलेले पूल बांधकाम विभागाने निर्माण केले आहेत. नाशिकमधून गोदावरी, काश्यपी, गौतमी या नद्यांचा उगम असल्यामुळे गंगापूर धरणाखालील गोदापात्राला दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर आला आहे. त्या पुराचे पाणी गोदावरीतील पात्रातून नांदूर-मधमेश्वरमार्गे जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आले आहे. जायकवाडीखालील गोदावरी पात्राच्या अंतरात पावसाचा जोर नसल्यामुळे पुलांचे नुकसान होईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. कायगाव, शहागड येथील जुन्या पुलांचे साधारणत: १० वर्षांपूर्वी बांधकाम झाले आहे.पैठणनजीकच्या आपेगाव येथील पूल मागेच खचला आहे. त्या पुलाला पर्याय असल्यामुळे तो अजून दुरुस्त झालेला नाही. विभागातील बहुतांश जिल्हा मार्ग खड्डेमय झाले आहेत. पावसाळ्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. २२०० कोटींच्या आसपास त्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी लागतील, असा अंदाज आहे.मुख्य अभियंता म्हणाले....महाडमधील दुर्घटना गंभीर आहे. तो पूल १०० वर्षे जुना असल्याचे वृत्त आहे. मराठवाड्यात काही जुने पूल आहेत. परंतु सध्या त्या पुलांना कुठलाही धोका नाही. विभागामार्फत जिल्हा पुलांचे इन्स्पेक्शन नियमित केले जाते. तरीही विभागातील सर्व यंत्रणेला जिल्ह्यांतील महत्त्वांच्या पुलांबाबत वाहतूक आणि सद्य:स्थिती काय आहे, याची माहिती तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तरी पुलांना कुठलाही धोका नाही. कोकणात सह्याद्रीच्या रांगांमुळे पावसाचे पाणी वेगाने येते. त्यामुळे त्याचा फटका रस्ते आणि पुलांना होता. तशी परिस्थिती मराठवाड्यात नाही. तसेच पावसाचे प्रमाणही संथ आहे, असे मुख्य अभियंता सुरकटवार यांनी नमूद केले.