शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

माझी रक्षा शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:05 IST

केऱ्हाळा : माझा मृत्यू झाला तर, माझी रक्षा नदीच्या पाण्यात टाकून प्रदूषण न करता आपल्या शेतात टाकून त्यावर पाच ...

केऱ्हाळा : माझा मृत्यू झाला तर, माझी रक्षा नदीच्या पाण्यात टाकून प्रदूषण न करता आपल्या शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा, अशी शेवटची इच्छा केऱ्हाळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमंतराव देवराव पांढरे यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी ही इच्छा पूर्ण केली असून, शेतात रक्षा विसर्जित करून त्यावर पाच झाडे लावण्यात आली आहेत.

हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते. हनुमंतराव यांचे ९ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तीन दिवसांनंतर त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक जमा झाले होते. अनेकांनी त्यांची रक्षा एखाद्या पवित्र स्थानी नदीत विसर्जित करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या मुलांनी वडिलांनी जिवंतपणी व्यक्त केलेली शेवटची इच्छा नातेवाइकांना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी ही रक्षा स्वत:च्या शेतात विसर्जित करून त्यावर पाच वृक्ष लावले. उपस्थित अनेक नातेवाइकांनी या उपक्रमाची स्तुती केली.

चौकट

सिल्लोड तालुक्यातील संस्कृतचे पहिले पीएच.डी.

दिवंगत हनुमंतराव पांढरे हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांनी १९७६ ला एमए, एमएड पूर्ण केले. १९७७-७९ ला संस्कृतमध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळविली. सिल्लोड तालुक्यातून संस्कृतमध्ये पीएच.डी. मिळविणारे ते पहिले व्यक्ती ठरले. त्यानंतर ते माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पहिले मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच कुस्तीची मैदानेही गाजविले होती. सलग पाच-पाच तास पोहण्याची त्यांची ख्याती होती. त्यांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

(फोटो- मयत हनुमंतराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांची रक्षा शेतात विसर्जित करून त्यावर पाच वृक्ष लावले.

120521\kailas vinayakrao pandhare_img-20210511-wa0096_1.jpg

मयत हनुमंतराव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांची रक्षा शेतात विसर्जित करुन त्यावर पाच वृक्ष लावले.