शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

लाभार्थ्यांना ठेवले अंधारात

By admin | Updated: February 18, 2016 23:44 IST

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने मागील तीन वर्षांची दुष्काळी परिस्थिती व नापिकी लक्षात घेत अन्न सुरक्षा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. या योजने अंतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारकांचा योजनेत समावेश केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना घोषणापत्र व सात-बाराचा उतारा पुरवठा विभागाकडे दाखल करावयाचा होता. त्याच्या पडताळणीनंतर शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करावयाची होती. परंतु, हे कागदपत्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी दाखल न करता स्वस्तधान्य दुकानदारांनीच परस्पर दाखल केली. परिणामी अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ राहिले व धान्यापासूनही वंचित राहिले. मानवत तालुक्यात ४ हजार ७८७ कुटुंबातील २७ हजार १८५ सदस्यांना ८१५ क्विंटल गहू आणि ५४३ क्विंटल तांदूळ वितरित होत आहे. असे असले तरी एवढे धान्य लाभार्थी शिधापत्रिकाधारक व सदस्यांपर्यंत पोहचत नाही, अशा तक्रारी आहेत. कोल्हावाडी या छोट्यागावात ३२ शेतकरी लाभार्थी असताना ८२ कुटुंबांचे धान्य पुरवठा विभागाने दिले. नंतर हा प्रकार उघडकीस आला. छोट्याशा गावात एवढा मोठा घोटाळा होत असल तर इतर गावांचा विचार करता या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. (वार्ताहर) (क्रमश:)