शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:10 IST

महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या २३ व्या अधिवेशनात अजंता फार्मा लि.चे. प्रेरक आणि संस्थापक पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या २३ व्या अधिवेशनात अजंता फार्मा लि.चे. प्रेरक आणि संस्थापक पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उद्योग व मानव कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित अधिवेशनात राष्ट्रसंत आचार्य विजय कौशलजी महाराज, भागवत भास्कर डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज, महामंडलेश्वर जगद्गुरूइंद्रदेवश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते जीवनगौरव, अग्रभूषण व अग्रश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अधिवेशनाचे उद्घाटन खा. डॉ. सुभाषचंद्र गोयल, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपालशरण गर्ग, प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळेस नाट्यगृहात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या कार्याला सलाम केला. यावेळी मुंबई येथील डालचंद गुप्ता यांना अग्रभूषण तर विनोद अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, सुरेश अग्रवाल, मधुसूदन गाडोदिया, वेदप्रकाश गुप्ता, राजेश अग्रवाल, पन्नालाल अग्रवाल यांना अग्रश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘छत्रपती महाराजा अग्रसेन की जय’ असा जयघोष केला. डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज म्हणाले की, तुमचा किती मोठा परिवार आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही सर्व एकत्र बसून जेवतात का, हे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना उत्तम संस्कार द्या, तेच मूल समाजाचे व देशाचे नाव उंच करील. जगद्गुरूइंद्रदेवश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, पुरस्कार सहज मिळत नाही. तो पुरस्कार मिळविण्यासाठी तेवढी पात्रता तयार करावी लागते. तेव्हा समाज स्वत: तुम्हाला पुरस्कार देईल. नेहमी म्हटले जाते जमाना बदल गया पण ते सत्य नाही, सूर्य, चंद्र, पृथ्वी बदलले नाही. मात्र, आपल्यातील संस्काराची वृद्धी झाली नाही म्हणून आपणास जमाना, समाज बदलल्यासारखे वाटते हे सत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. देशात व्यापारी कल्याण आयोग तर राज्यात व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष गोपालशरण गर्ग यांनी केली. अग्रवाल समाज उद्योग,व्यवसायात पुढे आहे; पण ‘राजकारणा’ चा टक्का कमी असल्याचे मत स्वागताध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी मांडले.राज्याध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी सर्व मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला. सोहळा यशस्वीतेसाठी सहकार्य केले त्यांचे आभार अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. समितीचे महामंत्री विशाल लदनिया, वरिष्ठ उपाध्यक्ष केशव लीला, ऋषी बागला, रतनलाल अग्रवाल, सीताराम अग्रवाल, निर्मला अग्रवाल, नवनीत भारतिया, रजनी बगडिया यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या अधिवेशनाचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अग्रवाल समाजबांधव आले होते.अग्रसेन महाराजांनीसमाजवादाचा पाया रचलालोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, ५ हजार वर्षांपूर्वी अग्रसेन महाराजांनी समाजवादाचा पाया रचला होता. अग्रोहा धाम येथून निघालेल्या अग्रवाल समाजबांधवांनी देशातच नव्हे, तर जगात आपल्या कार्याने, कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. शांती, संस्कृती टिकवून ठेवण्यात तसेच समाजसेवा, योगदानात अग्रवाल समाज नेहमी अग्रेसर राहतो. औरंगाबादेत दरवर्षी सर्व समाजबांधव एकत्र येऊन अग्रसेन महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करतात, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.