शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:10 IST

महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या २३ व्या अधिवेशनात अजंता फार्मा लि.चे. प्रेरक आणि संस्थापक पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या २३ व्या अधिवेशनात अजंता फार्मा लि.चे. प्रेरक आणि संस्थापक पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उद्योग व मानव कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित अधिवेशनात राष्ट्रसंत आचार्य विजय कौशलजी महाराज, भागवत भास्कर डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज, महामंडलेश्वर जगद्गुरूइंद्रदेवश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते जीवनगौरव, अग्रभूषण व अग्रश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अधिवेशनाचे उद्घाटन खा. डॉ. सुभाषचंद्र गोयल, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपालशरण गर्ग, प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरुषोत्तम अग्रवाल यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळेस नाट्यगृहात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या कार्याला सलाम केला. यावेळी मुंबई येथील डालचंद गुप्ता यांना अग्रभूषण तर विनोद अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, सुरेश अग्रवाल, मधुसूदन गाडोदिया, वेदप्रकाश गुप्ता, राजेश अग्रवाल, पन्नालाल अग्रवाल यांना अग्रश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘छत्रपती महाराजा अग्रसेन की जय’ असा जयघोष केला. डॉ. संजय कृष्ण सलीलजी महाराज म्हणाले की, तुमचा किती मोठा परिवार आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही सर्व एकत्र बसून जेवतात का, हे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना उत्तम संस्कार द्या, तेच मूल समाजाचे व देशाचे नाव उंच करील. जगद्गुरूइंद्रदेवश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, पुरस्कार सहज मिळत नाही. तो पुरस्कार मिळविण्यासाठी तेवढी पात्रता तयार करावी लागते. तेव्हा समाज स्वत: तुम्हाला पुरस्कार देईल. नेहमी म्हटले जाते जमाना बदल गया पण ते सत्य नाही, सूर्य, चंद्र, पृथ्वी बदलले नाही. मात्र, आपल्यातील संस्काराची वृद्धी झाली नाही म्हणून आपणास जमाना, समाज बदलल्यासारखे वाटते हे सत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. देशात व्यापारी कल्याण आयोग तर राज्यात व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष गोपालशरण गर्ग यांनी केली. अग्रवाल समाज उद्योग,व्यवसायात पुढे आहे; पण ‘राजकारणा’ चा टक्का कमी असल्याचे मत स्वागताध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी मांडले.राज्याध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी सर्व मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला. सोहळा यशस्वीतेसाठी सहकार्य केले त्यांचे आभार अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. समितीचे महामंत्री विशाल लदनिया, वरिष्ठ उपाध्यक्ष केशव लीला, ऋषी बागला, रतनलाल अग्रवाल, सीताराम अग्रवाल, निर्मला अग्रवाल, नवनीत भारतिया, रजनी बगडिया यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या अधिवेशनाचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अग्रवाल समाजबांधव आले होते.अग्रसेन महाराजांनीसमाजवादाचा पाया रचलालोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, ५ हजार वर्षांपूर्वी अग्रसेन महाराजांनी समाजवादाचा पाया रचला होता. अग्रोहा धाम येथून निघालेल्या अग्रवाल समाजबांधवांनी देशातच नव्हे, तर जगात आपल्या कार्याने, कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. शांती, संस्कृती टिकवून ठेवण्यात तसेच समाजसेवा, योगदानात अग्रवाल समाज नेहमी अग्रेसर राहतो. औरंगाबादेत दरवर्षी सर्व समाजबांधव एकत्र येऊन अग्रसेन महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करतात, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.