शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वेरूळ महोत्सवाचा उद्देशच हरपला

By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST

औरंगाबाद : महोत्सव घेण्याची ख्याती असलेल्या राज्य पर्यटन महामंडळाला पर्यटन राजधानीतच वेरूळ अजिंठा महोत्सवातील सातत्य राखण्यात अपयश आले आहे.

औरंगाबाद : महोत्सव घेण्याची ख्याती असलेल्या राज्य पर्यटन महामंडळाला पर्यटन राजधानीतच वेरूळ अजिंठा महोत्सवातील सातत्य राखण्यात अपयश आले आहे. पर्यटनवाढीचा मुख्य उद्देश असलेल्या महोत्सवाचा पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोणताही विचार न झाल्यामुळे, तसेच एकेकाळी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहोचलेला हा महोत्सव सरकारी अनास्थेच्या कचाट्यात सापडला आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्याच्या नावाने सुरू झालेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटनवृद्धी असाच होता, अशी माहिती या महोत्सवाशी सुरुवातीपासून संबंधित असलेल्या पर्यटन आणि इतिहासाचे अभ्यासक रफत कुरेशी यांनी सांगितले. मात्र, या उद्देशात आपण तीस वर्षांनंतरही सफ ल झालो असे म्हणता येत नाही. हे आपल्या पर्यटन राजधानीचे दुर्दैव म्हणावे लागेल. मागील वर्षी महोत्सव का झाला नाही, हे कळलेच नाही. यंदा मोठ्या कलावंतांच्या तारखा मिळणे अवघड आहे. त्यामुळे हा महोत्सव होणे कठीण दिसत आहे. इतिहासाच्या अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी म्हणतात की, ज्या उद्देशाने हा महोत्सव सुरू झाला त्याचा उद्देश सफल व्हायला पाहिजे. परदेशी पर्यटक, तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, असा उद्देश होता. वेरूळ येथे होत असलेला महोत्सव गैरसोयीचा ठरत होता म्हणून हा महोत्सव औरंगाबादेत आणण्यात आला. सुरुवातीला साधारणत: तीस लाख रुपयांमध्ये हा महोत्सव होत असे. काही उद्योजकही पुढे आले त्यामुळे ते सुसह्य बनले. देश- विदेशातील कलावंत येथे येतात त्यांची कला पाहायची संधी यानिमित्ताने मिळते. मुळात वेरूळ येथून हा महोत्सव औरंगाबादेत आणल्यानंतर व्ही. राधा जिल्हाधिकारी असताना तो तीन वर्षे सतत चालला. नंतर पुन्हा मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या हल्ल्यामुळे हा महोत्सव खंडित झाला. २०१२ साली तो पुन्हा सुरू झाला. मात्र, तो एका वर्षापुरताच. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव ज्या उत्साहाने आणि शिस्तीने अखंडितपणे चालू आहे. त्याच धर्तीवर हा महोत्सव चालू राहायला पाहिजे, अशी शहरातील कलावंतांची अपेक्षा आहे.