शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ महोत्सवाचा उद्देशच हरपला

By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST

औरंगाबाद : महोत्सव घेण्याची ख्याती असलेल्या राज्य पर्यटन महामंडळाला पर्यटन राजधानीतच वेरूळ अजिंठा महोत्सवातील सातत्य राखण्यात अपयश आले आहे.

औरंगाबाद : महोत्सव घेण्याची ख्याती असलेल्या राज्य पर्यटन महामंडळाला पर्यटन राजधानीतच वेरूळ अजिंठा महोत्सवातील सातत्य राखण्यात अपयश आले आहे. पर्यटनवाढीचा मुख्य उद्देश असलेल्या महोत्सवाचा पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोणताही विचार न झाल्यामुळे, तसेच एकेकाळी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहोचलेला हा महोत्सव सरकारी अनास्थेच्या कचाट्यात सापडला आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्याच्या नावाने सुरू झालेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटनवृद्धी असाच होता, अशी माहिती या महोत्सवाशी सुरुवातीपासून संबंधित असलेल्या पर्यटन आणि इतिहासाचे अभ्यासक रफत कुरेशी यांनी सांगितले. मात्र, या उद्देशात आपण तीस वर्षांनंतरही सफ ल झालो असे म्हणता येत नाही. हे आपल्या पर्यटन राजधानीचे दुर्दैव म्हणावे लागेल. मागील वर्षी महोत्सव का झाला नाही, हे कळलेच नाही. यंदा मोठ्या कलावंतांच्या तारखा मिळणे अवघड आहे. त्यामुळे हा महोत्सव होणे कठीण दिसत आहे. इतिहासाच्या अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी म्हणतात की, ज्या उद्देशाने हा महोत्सव सुरू झाला त्याचा उद्देश सफल व्हायला पाहिजे. परदेशी पर्यटक, तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, असा उद्देश होता. वेरूळ येथे होत असलेला महोत्सव गैरसोयीचा ठरत होता म्हणून हा महोत्सव औरंगाबादेत आणण्यात आला. सुरुवातीला साधारणत: तीस लाख रुपयांमध्ये हा महोत्सव होत असे. काही उद्योजकही पुढे आले त्यामुळे ते सुसह्य बनले. देश- विदेशातील कलावंत येथे येतात त्यांची कला पाहायची संधी यानिमित्ताने मिळते. मुळात वेरूळ येथून हा महोत्सव औरंगाबादेत आणल्यानंतर व्ही. राधा जिल्हाधिकारी असताना तो तीन वर्षे सतत चालला. नंतर पुन्हा मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या हल्ल्यामुळे हा महोत्सव खंडित झाला. २०१२ साली तो पुन्हा सुरू झाला. मात्र, तो एका वर्षापुरताच. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव ज्या उत्साहाने आणि शिस्तीने अखंडितपणे चालू आहे. त्याच धर्तीवर हा महोत्सव चालू राहायला पाहिजे, अशी शहरातील कलावंतांची अपेक्षा आहे.