शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सांडपाण्यापासून बनले पिण्याचे शुद्ध पाणी

By admin | Updated: May 4, 2016 01:30 IST

औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले

औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी सुरू केला आहे. अवघ्या तीन रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी या प्रकल्पातून मिळते. सध्या प्रायोगिक तत्त्वावर दररोज दहा हजार लिटर सांडपाणी पिण्यायोग्य बनविले जात आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस या पाण्याचा मोफत पुरवठा केला जात आहे. रेल्वेस्थानक औद्योगिक वसाहतीतून शहराचे दूषित पाणी घेऊन भलामोठा नाला वाहतो. परिसरातील नागरिक या नाल्यास ‘गंदा नाला’ म्हणून ओळखतात. नाल्याची कल्पना येण्यास हे नाव पुरेसे बोलके आहे. (पान २ वर)1नाल्याशेजारी विहीर खोदण्यात आली आहे. नाल्यातील पाणी झिरपून ही विहीर तुडुंब भरत असते. विहिरीतील सांडपाणी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीत घेतले जाते. त्यानंतर हे पाणी ‘बायोफिल्टर’ यंत्रात आणले जाते. यंत्रावर ४०० लिटर क्षमतेच्या टाकीत हे पाणी येते. तेथून गांडूळ खतांचा समावेश असलेल्या तीन ‘कंपार्टमेंट’मध्ये सोडले जाते. 2गांडूळ खत व इतर ‘बायोमीडिया’सोबत प्रक्रिया होऊन हे पाणी इतर टाक्यांत साठविले जाते. हे पाणी रासायनिक खतांना अतिशय चांगला पर्याय आहे. काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या पाण्यातून फळे, भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले आहे. पिण्यायोग्य करण्यासाठी पुढे हे पाणी ‘नॅनोफिल्टर’मध्ये नेले जाते. पाण्याची दुर्गंधी व पिवळसरपणा काढून टाकून ते पिण्यायोग्य बनविले जाते. (पान २ वर)