शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

सांडपाण्यापासून बनले पिण्याचे शुद्ध पाणी

By admin | Updated: May 4, 2016 01:30 IST

औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले

औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी सुरू केला आहे. अवघ्या तीन रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी या प्रकल्पातून मिळते. सध्या प्रायोगिक तत्त्वावर दररोज दहा हजार लिटर सांडपाणी पिण्यायोग्य बनविले जात आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस या पाण्याचा मोफत पुरवठा केला जात आहे. रेल्वेस्थानक औद्योगिक वसाहतीतून शहराचे दूषित पाणी घेऊन भलामोठा नाला वाहतो. परिसरातील नागरिक या नाल्यास ‘गंदा नाला’ म्हणून ओळखतात. नाल्याची कल्पना येण्यास हे नाव पुरेसे बोलके आहे. (पान २ वर)1नाल्याशेजारी विहीर खोदण्यात आली आहे. नाल्यातील पाणी झिरपून ही विहीर तुडुंब भरत असते. विहिरीतील सांडपाणी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीत घेतले जाते. त्यानंतर हे पाणी ‘बायोफिल्टर’ यंत्रात आणले जाते. यंत्रावर ४०० लिटर क्षमतेच्या टाकीत हे पाणी येते. तेथून गांडूळ खतांचा समावेश असलेल्या तीन ‘कंपार्टमेंट’मध्ये सोडले जाते. 2गांडूळ खत व इतर ‘बायोमीडिया’सोबत प्रक्रिया होऊन हे पाणी इतर टाक्यांत साठविले जाते. हे पाणी रासायनिक खतांना अतिशय चांगला पर्याय आहे. काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या पाण्यातून फळे, भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले आहे. पिण्यायोग्य करण्यासाठी पुढे हे पाणी ‘नॅनोफिल्टर’मध्ये नेले जाते. पाण्याची दुर्गंधी व पिवळसरपणा काढून टाकून ते पिण्यायोग्य बनविले जाते. (पान २ वर)