शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आमठाणा येथे २८०० रुपये क्विंटल दराने मिरची खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:04 IST

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. उन्हाळ्याच्या प्रतिकूल ...

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे मिरची खरेदीला सुरुवात झाली आहे. २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. उन्हाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीत मिरची जगवली. मात्र, तिला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

परिसरातील आमठाणा, घाटनांद्रा, धावडा, केळगाव, कन्नड तालुक्यातील चिंचोली, करंजखेडा या भागात एप्रिल महिन्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता ही मिरची निघायला सुरुवात आहे. सिल्लोड तालुक्यातील नावाजलेली मिरचीची बाजारपेठ म्हणून आमठाणा परिचित आहे. येथे स्थानिक व्यापाऱ्यांसह दिल्ली, मुंबई, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथूनही व्यापारी मिरची खरेदीसाठी येतात. मात्र, यंदा कोरोना स्थितीमुळे सदर व्यापारी येण्याची शक्यता धूसर आहे. मिरची आवक सुरु झाल्यामुळे स्थानिक व्यापारी राजू सुसर, गजानन देशमुख, बी. के. मोरे, सचिन चौधरी या मिरची व्यापाऱ्यांनी काटा सुरू केला आहे. सुरुवातीलाच मिरचीला प्रतिक्विंटल २८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गतवर्षी सुरुवातीलाच सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता.

कोट

कोरोनाच्या परिस्थितीमुळे परराज्यातील व्यापारी मिरची खरेदीला येत नसल्याने मिरचीचे दर कमी आहेत. येणाऱ्या काळात परिस्थिती सर्वसामान्य झाली, तर भाव वाढतील.

बाळासाहेब ईवरे, मिरची व्यापारी, आमठाणा

कोट

गतवर्षी चांगला दर मिळाल्याने शेतकरी खूश होते. यंदा मिरचीवर थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव असून, शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यात भाव चांगला मिळाला नाही, तर नाराजी होते.

जी. पी. सुरडकर, कृषी सहाय्यक, केळगाव

फोटो : आमठाणा येथील मिरची बाजार सुरू झाला असून, काट्याचे पूजन करताना मान्यवर.

180621\img-20210618-wa0218_1.jpg

आमठाणा येथील मिरची बाजार सुरु झाला असून काट्याचे पूजन करताना मान्यवर.