शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:23 IST

यावेळी नागरिकांनी दिलेल्या 'अमर रहे' , 'अमर रहे', 'शहीद जवान अमर रहे' च्या जयघोषाने विमानतळ परिसर दणाणून गेला.

औरंगाबाद: जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नितीन शिवाजी राठोड आणि संजय भिकमसिंह राजपूत यांचे पार्थिव आज हवाई दलाच्या विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी 'सीआरपीएफ'तर्फे त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी दिलेल्या 'अमर रहे' , 'अमर रहे','शहीद जवान अमर रहे' च्या जयघोषाने विमानतळ परिसर दणाणून गेला.

चोरपांघरा( ता. लोणार, जि. बुलढाणा) येथील नितीन शिवाजी राठोड आणि मलकापूर ( जि. बुलढाणा) येथील संजय भिकमसिंह राजपूत हे बुलढाणा जिल्ह्यातील जवान पुलवामा येथील जयघोषात शहीद झाले. या दोन्ही जवानांचे पार्थिव विमानाने सकाळी औरंगाबादेत आणण्यात आले. त्यांना सलामी देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी विमानतळाच्या परिसरात गर्दी केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'पाकिस्तान मुर्दाबाद, 'अमर रहे' , 'अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सलामी वाहिल्यानंतर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले.  

 

यावेळी पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खा. चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,  महापौर नंदकुमार घोडेले, मनपा जिल्हाधिकारी उदय चौधरी, आमदार अतुल सावे, संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, यांच्यासह नागरिकांनी सलामी दिली. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळJammu Kashmirजम्मू-काश्मीर