शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

जिल्ह्यात प्रचारफेऱ्यांनी शहरे गजबजली

By admin | Updated: October 12, 2014 00:38 IST

जालना : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये चौरंगी, पंचरंगी अशी अटीतटीची लढत होत आहे. प्रचार संपण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्व प्रमुख उमेदवारांनी

जालना : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये चौरंगी, पंचरंगी अशी अटीतटीची लढत होत आहे. प्रचार संपण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्व प्रमुख उमेदवारांनी मतदारसंघांतील शहरांमध्ये पदयात्रा, कॉर्नर बैठका, छोट्या सभा, मोठ्या सभांवर भर दिला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. जवळपास उमेदवारांनी सुरूवातीला ग्रामीण भागातील प्रचारावर भर दिला. पदयात्रा, बैठका, सभांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. महिला पदाधिकाऱ्यांनीही या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीमय वातावरण झालेले असल्याने चौकाचौकात, गल्लीबोळात, घराघरात सध्या निवडणुकीविषयीच्या चर्चेने रंग भरू लागला आहे. प्रमुख पक्षांसह अपक्षांच्या फेऱ्यांमध्येही युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. या निवडणुकीत युती आणि आघाडी नसल्याने प्रत्येक मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची संख्या वाढल्याने लढतीला चौरंगी, पंचरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने ही निवडणूक म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याची चर्चा पाचही मतदारसंघांमध्ये सुरू आहे. परिणामी उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती हिरारीने प्रचारांमध्ये गुंतलेले आहेत. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. सकाळी रस्त्यारस्त्यांवर ध्वनिक्षेपक वाहनांद्वारे किंवा पदयात्रांद्वारे राजकीय पक्षांचे जत्थेच्या जत्थे प्रचारात दिसत आहेत. दुपारी छोट्या किंवा मोठ्या सभा, सायंकाळी कॉर्नर बैठका तसेच सायंकाळनंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीने हॉटेल्स, ढाबे गजबजल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)