शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

बसस्थानकांच्या सुरक्षेसंदर्भात जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:05 IST

एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन आयुक्त यांच्यासह नऊ प्रतिवादींना नोटीस खंडपीठाची नोटीस : औरंगाबादसह राज्यातील बसस्थानके असुरक्षित औरंगाबाद : ...

एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन आयुक्त यांच्यासह नऊ प्रतिवादींना नोटीस

खंडपीठाची नोटीस : औरंगाबादसह राज्यातील बसस्थानके असुरक्षित

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील बसस्थानकांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या अनुषंगाने न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रतिवादी एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन आयुक्त यांच्यासह नऊ प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेवर २१ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात बँकिंगच्या परीक्षेसाठी अपंग विद्यार्थी औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात आला होता. एका खासगी ट्रॅव्हल्स एजंटने त्याचे अपहरण करून केवळ ५०० रुपयांसाठी त्याचा खून केला होता. या अनुषंगाने बसस्थानकावर पुरेशी सुरक्षा वाढवण्याची विनंती मुकेश भट्ट यांनी विभाग नियंत्रकांकडे केली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी ॲड. अक्षय लोहाडे व ॲड. संदेश हांगे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार राज्यभरातील बसस्थानकांमध्ये सुरक्षाव्यवस्थेचा अभाव आहे. बसस्थानकांमध्ये अनधिकृत खासगी एजंटांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. अनधिकृत खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट प्रवाशांना बसमध्ये जाण्यापासून रोखतात. बसस्थानकात सुरक्षा रक्षक किंवा पोलीस दिसत नाहीत. एका सर्वेक्षणात ७५ टक्के प्रवाशांना बसस्थानकात सुरक्षित वाटत नाही. बसस्थानकात पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे. कॅन्टीनमधील अन्नाची गुणवत्ता नाही. वैद्यकीय सुविधा नाहीत, डॉक्टर उपलब्ध नसतात आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.