शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

गटशेतीसाठी २०० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:57 IST

टशेतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी राज्य शासनाने गटशेती योजना तयार केली असून, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : गटशेतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी राज्य शासनाने गटशेती योजना तयार केली असून, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे १४६ व्या द्वादश कार्यक्रमानिमित्त गटशेती करणा-या शेतक-यांचा मेळावा आणि गटशेती पाहणी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, सीईओ दीपक चौधरी, फळबाग शास्त्रज्ज्ञ डॉ.भगवान कापसे, जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तालुका अध्यक्ष गोविंदराव पंडित, सभापती साहेबराव कानडजे, चेरमन विजयनाना परिहार, जि.प. शालिकराम म्हस्के, संतोष लोखंडे, आशा पांडे, तुकाराम जाधव, शिवाजीराव थोटे, सुरेश दिवटे, मुकेश चिने, नाना भागिले, सुधीर पाटील, प्रदीप मुळे, दत्तू पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की गटशेती ही काळाची गरज आहे. जालना जिल्ह्यातील गटशेतीचे मॉडेल राज्य शासनाने स्वीकारले असून, गटशेती करणा-या शेतक-यांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कृषी योजनांचा लाभ दिला जाईल. १८ आॅक्टोबरपासून कापूस उत्पादक शेतक-यांसाठी शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदी करून घेतला जाईल. त्यामुळे शेतक-यांनी व्यापाºयांना कापूस न देता शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर द्यावा.गटशेती प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी माहिती दिली. या वेळी खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ.संतोष दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गटशेती करणारे चांगुणाबाई बाळू कापसे यांच्या शेतातील शेत तळे, द्राक्ष बागेची पाहणी केली. जीवरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यामध्ये अडविण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. तसेच राजूर ते टेंभूर्णी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाले. उद्धव दूनगहू यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंदराव पंडित यांनी आभार मानले.