शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा

By admin | Updated: July 28, 2015 01:18 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटदेखील ओढवले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटदेखील ओढवले आहे. त्यामुळे आठही जिल्ह्यांतील केशरी रंगाच्या शिधापत्रिका असलेल्या दारिद्र्य रेषेवरील सुमारे १० लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोप्रमाणे गहू शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. १ आॅगस्टपासून याचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता असून, जास्तीच्या धान्याची मागणी नोंदविण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पुरवठा विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जूननंतर राज्यातील अनेक भागांत पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यंदाही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होऊ नये, यादृष्टीने विभागातील आठ जिल्हे आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद विभागांत यासंबंधी आदेश जारी झाले असून, यंत्रणा कामाला लागली आहे.पुरवठा अधिकारी संजय जाधवर म्हणाले, २५ टक्के लाभार्थी वाढण्याची शक्यता आहे. धान्य साठा वाढेल, त्यासाठी मागणीदेखील नोंदवावी लागेल. १ आॅगस्टपासून किंवा त्यापुढील आठवड्यापासून वितरण सुरू होऊ शकते. या निर्णयामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. विभागातील १० लाख शेतकऱ्यांना या योजनेतून धान्य पुरवठा होऊ शकेल. एपीएल (केसरी) रेशनकार्ड असलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो या परिमाणात धान्य देण्यात येईल. केंद्र शासनाकडून इकॉनॉमिक कॉस्टने अ दर्जाचा तांदूळ व गहू खरेदी करून शेतकऱ्यांना अनुक्रमे ३ व २ रुपये किलो या दराने देण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता.