शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

दुष्काळ प्रश्नांवरील आंदोलनांना मनाई

By admin | Updated: September 16, 2015 00:03 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड लोकभावना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलने करतात. यातून प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. प्रश्न मार्गी लागतात,

व्यंकटेश वैष्णव , बीडलोकभावना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलने करतात. यातून प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. प्रश्न मार्गी लागतात, लागलेले आहेत. मात्र आता पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गणेशोत्सवाचे कारण पुढे करत आंदोलने करण्यालाच मज्जाव केला आहे. मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून जिल्हयात विविध ठिकाणी (मनाई आदेश) प्रतिबंधात्मक आदेश लागू करून तुघलकी कारभाराचा प्रत्यय दिला आहे.बीड जिल्हा हा चळवळींचे उगमस्थान आहे. बीडचे माजी खा. क्रांतीसिंह नाना पाटील हे बीडचे खासदार असताना शेतकऱ्यांवरील कर्जासाठी संसदेवर बैलगाडी मोर्चा काढून ‘फिटले म्हणा’ चा नारा दिला होता. याचा विसर आताच्या शासन व प्रशासनाला पडत असल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाचे कारण पुढे करत जिल्हा प्रशासनाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकाच्या सुरूवातीलाच दुष्काळी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांमुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडून मोठा अनर्थ होईल, अशा अर्थाने जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.जिल्हयात गेल्या पावसाळ्या अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अशा स्थितीत शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना आंदोलने करत आहेत. ही आंदोलने दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सरकारवरचा रोष आंदोलनांमधून कार्यकर्ते व्यक्त करत असतानाच गणेशोत्सवाचे कारण पुढे करून जिल्हयात मनाई आदेश जारी केला आहे. लोकभावना लक्षात घेवून आंदोलने करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने काढलेल्या फतव्यामुळे आंदोलनाच्या अधिकारावरच टाच आली असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत काढलेल्या या आदेशाने संताप व्यक्त होत आहे.