शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

दुष्काळ प्रश्नांवरील आंदोलनांना मनाई

By admin | Updated: September 16, 2015 00:03 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड लोकभावना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलने करतात. यातून प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. प्रश्न मार्गी लागतात,

व्यंकटेश वैष्णव , बीडलोकभावना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलने करतात. यातून प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. प्रश्न मार्गी लागतात, लागलेले आहेत. मात्र आता पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गणेशोत्सवाचे कारण पुढे करत आंदोलने करण्यालाच मज्जाव केला आहे. मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून जिल्हयात विविध ठिकाणी (मनाई आदेश) प्रतिबंधात्मक आदेश लागू करून तुघलकी कारभाराचा प्रत्यय दिला आहे.बीड जिल्हा हा चळवळींचे उगमस्थान आहे. बीडचे माजी खा. क्रांतीसिंह नाना पाटील हे बीडचे खासदार असताना शेतकऱ्यांवरील कर्जासाठी संसदेवर बैलगाडी मोर्चा काढून ‘फिटले म्हणा’ चा नारा दिला होता. याचा विसर आताच्या शासन व प्रशासनाला पडत असल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाचे कारण पुढे करत जिल्हा प्रशासनाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकाच्या सुरूवातीलाच दुष्काळी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांमुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडून मोठा अनर्थ होईल, अशा अर्थाने जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.जिल्हयात गेल्या पावसाळ्या अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अशा स्थितीत शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना आंदोलने करत आहेत. ही आंदोलने दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सरकारवरचा रोष आंदोलनांमधून कार्यकर्ते व्यक्त करत असतानाच गणेशोत्सवाचे कारण पुढे करून जिल्हयात मनाई आदेश जारी केला आहे. लोकभावना लक्षात घेवून आंदोलने करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने काढलेल्या फतव्यामुळे आंदोलनाच्या अधिकारावरच टाच आली असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत काढलेल्या या आदेशाने संताप व्यक्त होत आहे.