शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

दुष्काळ प्रश्नांवरील आंदोलनांना मनाई

By admin | Updated: September 16, 2015 00:03 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड लोकभावना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलने करतात. यातून प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. प्रश्न मार्गी लागतात,

व्यंकटेश वैष्णव , बीडलोकभावना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलने करतात. यातून प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. प्रश्न मार्गी लागतात, लागलेले आहेत. मात्र आता पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गणेशोत्सवाचे कारण पुढे करत आंदोलने करण्यालाच मज्जाव केला आहे. मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून जिल्हयात विविध ठिकाणी (मनाई आदेश) प्रतिबंधात्मक आदेश लागू करून तुघलकी कारभाराचा प्रत्यय दिला आहे.बीड जिल्हा हा चळवळींचे उगमस्थान आहे. बीडचे माजी खा. क्रांतीसिंह नाना पाटील हे बीडचे खासदार असताना शेतकऱ्यांवरील कर्जासाठी संसदेवर बैलगाडी मोर्चा काढून ‘फिटले म्हणा’ चा नारा दिला होता. याचा विसर आताच्या शासन व प्रशासनाला पडत असल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाचे कारण पुढे करत जिल्हा प्रशासनाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकाच्या सुरूवातीलाच दुष्काळी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांमुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडून मोठा अनर्थ होईल, अशा अर्थाने जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.जिल्हयात गेल्या पावसाळ्या अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अशा स्थितीत शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना आंदोलने करत आहेत. ही आंदोलने दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सरकारवरचा रोष आंदोलनांमधून कार्यकर्ते व्यक्त करत असतानाच गणेशोत्सवाचे कारण पुढे करून जिल्हयात मनाई आदेश जारी केला आहे. लोकभावना लक्षात घेवून आंदोलने करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने काढलेल्या फतव्यामुळे आंदोलनाच्या अधिकारावरच टाच आली असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत काढलेल्या या आदेशाने संताप व्यक्त होत आहे.