शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

राखीव वनक्षेत्रातीलच झुडपे तोडली!

By admin | Updated: July 4, 2017 00:06 IST

औरंगाबाद : सारोळा परिसरातील राखीव वनक्षेत्रात गतवर्षी लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी चक्क बाजूचीच झुडपे तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गजानन दिवाण । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सारोळा परिसरातील राखीव वनक्षेत्रात गतवर्षी लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी चक्क बाजूचीच झुडपे तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी झुडपे तोडली तीही राखीव वनक्षेत्रातीलच असल्याने वन कायदा कलम २६ अंतर्गत वन कर्मचाऱ्यांनीच गुन्हा केल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुंपणच वन खातेय’ ही बातमी प्रसिद्ध करताच उपवनसंरक्षक सतीश वडसकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून साधारण २५ कि.मी. अंतरावर असलेल्या या सारोळा जंगलात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी पक्षीमित्र पंकज शक्करवार, रूपाली शक्करवार आणि अश्विनी मोहरीर यांनी उघडकीस आणला. ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी दुपारी प्रत्यक्ष या ठिकाणाची पाहणी केली. खुलताबाद वनाची हद्द संपते तेथून सारोळा गावाच्या दिशेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतवर्षी वृक्षारोपण मोहिमेत तब्बल १२०० झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांना गेल्या तीन दिवसांपासून दोन वन कर्मचाऱ्यांच्या निगराणीत कुंपण घालण्याचे काम केले जात आहे. यासाठी चार मजूर काम करीत आहेत. वन कायदा कलम २६ अंतर्गत राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड, खोदकाम, साफसफाई, आग लावणे हा गुन्हा समजला जातो. सारोळा जंगलदेखील राखीव वनक्षेत्र असताना त्यातील झुडपे तोडून या झाडांना कुंपण घातले जात आहे. साधारण आठ ते दहा ट्रॅक्टर भरतील इतकी झुडपे या तीन दिवसांत तोडली असल्याचे प्रत्यक्ष तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तोडलेल्या झुडपांचे कुंपण करा. नव्याने तोडू नका, असे आदेश साहेबांनी दिल्याचे एका कामगाराने सांगितले. साधारण पाचशे झाडांना कुंपण लावण्यात आले असून, प्रत्येक कुंपणाला आठ ते दहा फांद्या लावल्या आहेत. याचा अर्थ पाचशे झाडांसाठी किमान निम्मे म्हणजे अडीचशे झुडपांवर वनविभागाच्या परवानगीनेच कुऱ्हाड चालविली गेली आहे. पक्ष्यांचा घरटी करण्याचा आणि अंडी घालण्याचा हाच हंगाम आहे. बाभळीच्या जंगलात बुलबुल घरटी घालते, करवंदाच्या जंगलात वटवट्या हा पक्षी घरटी घालतो, तर आमटी-करवंदाच्या फळांचा हाच कार्यकाळ असून, पक्ष्यांचे ते प्रमुख खाद्य आहे. या क्षेत्रात हेच झुडपी जंगल आहे. ज्या झुडपांची कटाई करण्यात आली त्यावरही पक्ष्यांची घरटी दिसली. सारोळा परिसरात पक्ष्यांच्या साधारण १६० प्रजाती आढळतात. यातील जवळपास २० टक्के पक्षी कटाई झालेल्या क्षेत्रात आढळतात. बटेर, तितर आणि मोर या सारख्या पक्ष्यांसाठी हा परिसर ओळखला जातो. या कटाईमुळे त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे.