शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘समृद्धी’ महामार्ग होण्याआधीच नामकरणाची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:06 IST

: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देभाजप-शिवसेना वादात राष्ट्रवादी काँगे्रसची उडी : राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी

औरंगाबाद : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. यातच भाजपच्या आमदारांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी केली. रस्ता कामाला सुरुवात होण्याअगोदरच नावावरून वादविवाद सुरू झाले आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना दिलेल्या निवेदनात अभिजित देशमुख यांनी म्हटले आहे की, विदर्भातील सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव यांच्या कन्या राजमाता जिजाऊ नंतर मराठवाड्यातील वेरूळला शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून नांदायला आल्या. या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळख प्राप्त झाल्यास या महामार्गालाही एक भूषण प्राप्त होईल. खरं तर राजमाता जिजाऊ यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राला समृद्धी लाभत नाही. मग समृद्धी महामार्ग त्यांच्या नावाशिवाय कसा होईल. हा महामार्ग विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र-कोकण, मुंबई प्रांत यांना जोडणारा आहे. या सर्व विभागांना जोडणारा ऐतिहासिक दुवा हा जिजाऊ हाच आहे. यामुळे समृद्धी महामार्गाला राजामाता जिजाऊ यांचे नाव देणे अधिक संयुक्तिक ठरेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.महिलांचा सन्मान होईलजिजाऊ यांचे नाव दिल्यास ज्या गौरवशाली इतिहासाचा महाराष्ट्राला आणि देशाला सार्थ अभिमान वाटतो, त्या परंपरेचे स्मरण यानिमित्ताने सदैव होत राहील. महाराष्ट्राचे मन, मनगट आणि मणका समृद्ध करणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव या महामार्गाला दिल्यास महिलांविषयी असलेल्या सन्मानाचे एक उदाहरण जगासमोर जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.------------

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकPoliticsराजकारण