शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
3
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
4
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
5
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
8
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
9
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
10
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
11
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
12
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
13
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
14
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
15
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
16
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
17
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
18
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
19
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
20
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ महामार्ग होण्याआधीच नामकरणाची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 23:06 IST

: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देभाजप-शिवसेना वादात राष्ट्रवादी काँगे्रसची उडी : राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी

औरंगाबाद : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. यातच भाजपच्या आमदारांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी केली. रस्ता कामाला सुरुवात होण्याअगोदरच नावावरून वादविवाद सुरू झाले आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना दिलेल्या निवेदनात अभिजित देशमुख यांनी म्हटले आहे की, विदर्भातील सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव यांच्या कन्या राजमाता जिजाऊ नंतर मराठवाड्यातील वेरूळला शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून नांदायला आल्या. या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळख प्राप्त झाल्यास या महामार्गालाही एक भूषण प्राप्त होईल. खरं तर राजमाता जिजाऊ यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राला समृद्धी लाभत नाही. मग समृद्धी महामार्ग त्यांच्या नावाशिवाय कसा होईल. हा महामार्ग विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र-कोकण, मुंबई प्रांत यांना जोडणारा आहे. या सर्व विभागांना जोडणारा ऐतिहासिक दुवा हा जिजाऊ हाच आहे. यामुळे समृद्धी महामार्गाला राजामाता जिजाऊ यांचे नाव देणे अधिक संयुक्तिक ठरेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.महिलांचा सन्मान होईलजिजाऊ यांचे नाव दिल्यास ज्या गौरवशाली इतिहासाचा महाराष्ट्राला आणि देशाला सार्थ अभिमान वाटतो, त्या परंपरेचे स्मरण यानिमित्ताने सदैव होत राहील. महाराष्ट्राचे मन, मनगट आणि मणका समृद्ध करणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव या महामार्गाला दिल्यास महिलांविषयी असलेल्या सन्मानाचे एक उदाहरण जगासमोर जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.------------

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकPoliticsराजकारण