शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

समृद्धी महामार्गामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:05 IST

पावसाचे पाणी शिरले शेतीत: नुकसान पाहणीचे आदेश औरंगाबाद: जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाला ...

पावसाचे पाणी शिरले शेतीत: नुकसान पाहणीचे आदेश

औरंगाबाद: जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात झालेल्या पावसात शहरालगतच्या भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या तीन गावांतील शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाला सोमवारी दिले. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शहरालगतच्या गावात पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचा आढावा व उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार ज्योती पवार, समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, प्रकल्प अधिकारी शंकरा उपस्थित होते. पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने, डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेजारील गावातील शेतात शिरून पिकांचे नुकसान झाले. यापुढील अशा घटना रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश चव्हाण यांनी दिले.

७० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे केले असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. या नुकसानीत भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या गावांतील अंदाजे ७० शेतकऱ्यांच्या जवळपास २० हेक्टर शेतजमिनीवरील फळपिके व कांदापिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.