शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

प्रकुलगुरूंची नेमणूक होईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे. या पदावर नेमणुकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी शिफारस केली. मात्र, राज्यपाल कार्यालय कोणालाही जुमानत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी बीसीयूडीऐवजी प्रकुलगुरूंना अधिकार देण्यात आले आहेत. बीसीयूडी हे पदच नवीन कायद्याने रद्द केले. यामुळे राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांना प्रकुलगुरू नेमणे बंधनकारक झाले होते.राज्यातील काही विद्यापीठांमध्ये पूर्वीपासूनच प्रकुलगुरू कार्यरत होते. मात्र, ज्या विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरू नव्हते, अशा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रकुलगुरूंची नेमणूक करण्यासाठी राज्यपालांकडे तीन नावांची शिफारस केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनीही तीन जणांची शिफारस केली.या शिफारशीनुसार राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन, विभागप्रमुख डॉ. एस.जी. हिवरे आणि भूगर्भतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर दुसºयाच दिवशी प्रकुलगुरू निवडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यात भाजपशी संबंधित असलेल्या ‘अभाविप’चे कार्यकर्ते असलेले डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या नेमणुकीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याचे समजते. यानंतर डॉ. तेजनकर यांच्या नावालाही सत्ताधारी गोटातून पसंती देण्यात आली. मात्र, अद्यापही त्याविषयी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.प्रकुलगुरूंच्या नेमणुकीसाठी विधानसभ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘एका’ उमेदवाराच्या नावाची शिफारस केली. या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही होकार कळविला असल्याचे समजते. तरीही प्रकुलगुरूंची नेमणूक होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमणूक रखडलेले एकमेव विद्यापीठराज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरूंची तात्काळ नेमणूक केली आहे. मात्र, केवळ औरंगाबादचेच विद्यापीठ या नेमणुकीपासून वंचित ठेवलेले आहे. मराठवाड्यातील लोकांना अन्याय सहन करण्याची सवय असल्यामुळे या दिरंगाईबद्दल कोणी ‘ब्र’शब्दसुद्धा काढलेला नाही. हे विशेष. ‘संघ’ विचाराचा एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे ही निवड रखडल्याचेही बोलले जाते. मात्र, यात विद्यापीठाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात आहे.