शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

प्रकुलगुरूंची नेमणूक होईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे. या पदावर नेमणुकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी शिफारस केली. मात्र, राज्यपाल कार्यालय कोणालाही जुमानत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी बीसीयूडीऐवजी प्रकुलगुरूंना अधिकार देण्यात आले आहेत. बीसीयूडी हे पदच नवीन कायद्याने रद्द केले. यामुळे राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांना प्रकुलगुरू नेमणे बंधनकारक झाले होते.राज्यातील काही विद्यापीठांमध्ये पूर्वीपासूनच प्रकुलगुरू कार्यरत होते. मात्र, ज्या विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरू नव्हते, अशा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रकुलगुरूंची नेमणूक करण्यासाठी राज्यपालांकडे तीन नावांची शिफारस केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनीही तीन जणांची शिफारस केली.या शिफारशीनुसार राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन, विभागप्रमुख डॉ. एस.जी. हिवरे आणि भूगर्भतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर दुसºयाच दिवशी प्रकुलगुरू निवडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यात भाजपशी संबंधित असलेल्या ‘अभाविप’चे कार्यकर्ते असलेले डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या नेमणुकीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याचे समजते. यानंतर डॉ. तेजनकर यांच्या नावालाही सत्ताधारी गोटातून पसंती देण्यात आली. मात्र, अद्यापही त्याविषयी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.प्रकुलगुरूंच्या नेमणुकीसाठी विधानसभ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘एका’ उमेदवाराच्या नावाची शिफारस केली. या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही होकार कळविला असल्याचे समजते. तरीही प्रकुलगुरूंची नेमणूक होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमणूक रखडलेले एकमेव विद्यापीठराज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरूंची तात्काळ नेमणूक केली आहे. मात्र, केवळ औरंगाबादचेच विद्यापीठ या नेमणुकीपासून वंचित ठेवलेले आहे. मराठवाड्यातील लोकांना अन्याय सहन करण्याची सवय असल्यामुळे या दिरंगाईबद्दल कोणी ‘ब्र’शब्दसुद्धा काढलेला नाही. हे विशेष. ‘संघ’ विचाराचा एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे ही निवड रखडल्याचेही बोलले जाते. मात्र, यात विद्यापीठाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात आहे.