शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

प्रकुलगुरूंची नेमणूक होईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे. या पदावर नेमणुकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी शिफारस केली. मात्र, राज्यपाल कार्यालय कोणालाही जुमानत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी बीसीयूडीऐवजी प्रकुलगुरूंना अधिकार देण्यात आले आहेत. बीसीयूडी हे पदच नवीन कायद्याने रद्द केले. यामुळे राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांना प्रकुलगुरू नेमणे बंधनकारक झाले होते.राज्यातील काही विद्यापीठांमध्ये पूर्वीपासूनच प्रकुलगुरू कार्यरत होते. मात्र, ज्या विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरू नव्हते, अशा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रकुलगुरूंची नेमणूक करण्यासाठी राज्यपालांकडे तीन नावांची शिफारस केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनीही तीन जणांची शिफारस केली.या शिफारशीनुसार राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन, विभागप्रमुख डॉ. एस.जी. हिवरे आणि भूगर्भतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर दुसºयाच दिवशी प्रकुलगुरू निवडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यात भाजपशी संबंधित असलेल्या ‘अभाविप’चे कार्यकर्ते असलेले डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या नेमणुकीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याचे समजते. यानंतर डॉ. तेजनकर यांच्या नावालाही सत्ताधारी गोटातून पसंती देण्यात आली. मात्र, अद्यापही त्याविषयी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.प्रकुलगुरूंच्या नेमणुकीसाठी विधानसभ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘एका’ उमेदवाराच्या नावाची शिफारस केली. या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही होकार कळविला असल्याचे समजते. तरीही प्रकुलगुरूंची नेमणूक होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमणूक रखडलेले एकमेव विद्यापीठराज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरूंची तात्काळ नेमणूक केली आहे. मात्र, केवळ औरंगाबादचेच विद्यापीठ या नेमणुकीपासून वंचित ठेवलेले आहे. मराठवाड्यातील लोकांना अन्याय सहन करण्याची सवय असल्यामुळे या दिरंगाईबद्दल कोणी ‘ब्र’शब्दसुद्धा काढलेला नाही. हे विशेष. ‘संघ’ विचाराचा एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे ही निवड रखडल्याचेही बोलले जाते. मात्र, यात विद्यापीठाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात आहे.