शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

निधी खर्च करण्यासाठी प्रस्तावांचा धुमधडाका

By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST

सतीश जोशी, परभणी आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध परभणी जिल्ह्यातील आमदारांना लागले असून, त्या दृष्टीने तयारी चालू आहे़

सतीश जोशी, परभणीआगामी विधानसभा निवडणुकीचे वेध परभणी जिल्ह्यातील आमदारांना लागले असून, त्या दृष्टीने तयारी चालू आहे़ निवडणुकीपूर्वी आमदार निधी खर्च करण्यासाठी प्रस्तावित कामांचा धुमधडाका आमदारांनी सुरू केला आहे़ सर्वात जास्त म्हणजे १ कोटी ८५ लाखांची कामे आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी तर सर्वात कमी म्हणजे ८३ लाखांची कामे आ़ मीराताई रेंगे यांनी प्रस्तावित केली आहेत़ हा आकडा आचारसंहितेपर्यंत वाढू शकतो़ प्रत्येक आमदाराला आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघातील विकासाची कामे करण्यासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होतो़ १ एप्रिल २०१४ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून, जिल्ह्यातील आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला आहे़ आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी त्याची आचारसंहिता आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे़ तत्पूर्वी मिळालेला हा दोन कोटी रुपयांचा निधी जास्तीत जास्त कसा खर्च होईल, यासाठी जिल्ह्यातील आमदार प्रयत्नशील आहेत़ परभणी जिल्ह्यात जिंतूरमधून आ़ रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडमध्ये आ़ सीताराम घनदाट, पाथरीतून आ़ मीराताई रेंगे हे विधानसभेवर निवडून गेले़ विधान परिषदेवर बाबाजानी निवडून आले आहेत़ राज्यमंत्री फौजिया खान यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यामुळे आणि परभणीचे लोकप्रतिनिधी आ़ संजय जाधव हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांचा प्रत्येकी दोन कोटी असा चार कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला या आर्थिक वर्षासाठी मिळाला नाही़ एकूण आठ कोटी निधीतून प्रस्ताव दाखल करण्याचे काम अजूनही चालू असून, प्रस्तावित कामांचा आकडा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे़ कामे मंजूर करून पूर्ण करण्यासाठी आवधी कमी असल्यामुळे लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू आहे़ १़९४ कोटी रुपयांचा निधी शिल्लक एप्रिलपासून आतापर्यंत तीन महिन्यांत हे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या विकास निधीतील आणखी केवळ १.९४ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निधी खर्च करण्याचा आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आमदारांकडून जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर कामांचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. येत्या महिनाभरात या निधीतून विविध कामे सुचविली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी एऩजी़ पतंगे यांनी सांगितले की, आमदारांनी विकासकामे सुचविल्यानंतर प्रशासनातर्फे त्याला मंजुरी दिली जाते. त्या- त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सुचवून मंजुरी घ्यावी लागते. ही मंजुरी घेतल्यानंतर ते काम करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. त्यात केव्हाही हे काम केले जाऊ शकते. आतापर्यंत जिंतूरचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी १ कोटी ७८ लाख रुपयांची, पाथरीच्या आ़ मीराताई रेंगे यांनी ८३ लाख रुपयांची, गंगाखेडचे आ़ सीताराम घनदाट यांनी १ कोटी ६० लाख रुपयांची तर विधान परिषद सदस्य आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी १ कोटी ८५ लाख रुपयांची कामे या आर्थिक वर्षात प्रस्तावित केली असल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली़