शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी थायलंडच्या राजदूतांना प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 18:51 IST

विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातर्फे थायलंडच्या राजदूतांना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव आता राजदूतांकडून वरिष्ठ पातळीवर जाणार असून, लवकरच त्यावर निर्णय होईल.

विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि तिरुपतीशी हवाईसेवेने जोडलेले आहे. गेल्या दीड वर्षापासून विमानसेवा वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी १६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली होती. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

थायलंडचे राजदूत चुटिन्टोन गोंगस्कडी यांची ८ मार्च रोजी भेट घेऊन डी. जी. साळवे यांनी औरंगाबादहून बँकॉक आणि आशियाई देशांना आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव सादर केला. यावेळी चुटिन्टोन गोंगस्कडी प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. हा प्रस्ताव आता वरच्या पातळीवर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे डी. जी. साळवे यांनी सांगितले. 

विमानतळ प्राधिक रणाकडून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एअर विस्ताराकडून विमानसेवा सुरूकरण्याची तयारी दर्शविली. त्यांच्याकडून विमानसेवा सुरू होण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळण्याची गरज आहे. हे पाठबळ मिळाल्यास आगामी कालावधीत औरंगाबादहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अजिंठा लेणींची प्रशंसाचुटिन्टोन गोंगस्कडी यांनी जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणींची प्रशंसा केली. येथील कला, चित्रकलेचे कौतुक करीत त्यांनी हे सर्वकाही अद्भुत असल्याचे म्हटले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAirportविमानतळtourismपर्यटन