शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

५०० गावांत शुद्ध पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव

By admin | Updated: August 8, 2014 01:26 IST

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़ हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून सदर आराखड्यास राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे़जिल्ह्यातील अनेक गावांत दुषीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्याचवेळी किनवट व माहूर तालुक्यासह अन्य भागातही काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ येथील नागरिक विविध आजारांशी लढा देत आहेत़ ही बाब लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी गावांमध्ये पाणीपुरवठा यंत्र बसविण्याबाबत चाचपणी केली़ त्यानुसार केंद्र शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधीतून हा आरोग्यदायी प्रकल्प राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांनी शुध्द पाणीपुरवठा यंत्राबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत़ या सर्व गावातील यंत्रांसाठी जवळपास १६ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे़ प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा यंत्र बसविले जाणार आहेत़ एका यंत्रासाठी ३ लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षीत आहे़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या यंत्रांसाठी अपेक्षीत किंमतीच्या निविदा मागविल्या आहेत़ राज्यभरातील विविध कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्याची छाननी केली जात आहे़ मागास क्षेत्र अनुदान निधी प्राप्त होताच प्रस्ताव आलेल्या गावात पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात येथील अशी माहिती प्रभारी प्रकल्प संचालक गुलाबसिंह राठोड यांनी दिली़ (प्रतिनिधी)