शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

५६ पैकी चारच ग्रा.पं.चे तंटामुक्तीसाठी प्रस्ताव

By admin | Updated: September 14, 2014 23:46 IST

पिंपळनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथे तंटामुक्ती अभियानाला उदासिनता आल्यामुळे दिवसेंदिवस तंट्यामध्ये वाढ होत चालली आहे.

पिंपळनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथे तंटामुक्ती अभियानाला उदासिनता आल्यामुळे दिवसेंदिवस तंट्यामध्ये वाढ होत चालली आहे. पिंपळनेर परिसरात ५६ ग्रामपंचायती असुनही फक्त चार ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र शासनाने गावपातळीवर निर्माण होणारे छोटे-मोठे तंटे, भांडणे मिटावीत, गावागावात शांतता अबाधीत रहावी यासाठी तंटामुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी तंटामुक्तीला प्रतिसाद आहे मात्र पिंपळनेर परिसरात या अभियानास उदासिनता आली असल्याचे समोर आले आहे. पिंंपळनेर पोलीस ठाण्यार्तंगत ७६ गावांचा समावेश होतो. केवळ चारच ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला आहे. ५६ ग्रामपंचायतीमधुन या गावांचा कारभार चालत असुन यासाठी पिंपळनेर पोलीस ठाणे आहे. ठाण्यात दोन अधिकारी व २५ कर्मचारी आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम राबविणे अनिवार्य आहे. त्यासाठी १५ आॅगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभेमध्ये समितची निवड केली जाते परंतु पोलिसांची या बाबतची उदासिनता, ग्रामस्थ, ग्रामसेवक व सरपंच यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने मोहिमेस उतरती कळा लागली आहे. पिंपळनेर परिसरातील ५६ ग्रामपंचायतीमधील गुंधावाडी, वलीपुर जवळा, पिंपळादेवी, वाक नाथापुर या चार ग्रामपंचायतिंनी ठराव दिले आहेत. इतर ग्रामपंचायतिंनी सहभाग घेतला नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आहेत. या संर्दभात बोलताना पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शेख म्हणाले, ग्रामसेवकांनी ग्रामसभेचा प्रस्ताव देऊन सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ चार ग्रापंने ठराव दिला आहे. इतर ग्रा.पं.ना सुचना देण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)