शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

५६ पैकी चारच ग्रा.पं.चे तंटामुक्तीसाठी प्रस्ताव

By admin | Updated: September 14, 2014 23:46 IST

पिंपळनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथे तंटामुक्ती अभियानाला उदासिनता आल्यामुळे दिवसेंदिवस तंट्यामध्ये वाढ होत चालली आहे.

पिंपळनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथे तंटामुक्ती अभियानाला उदासिनता आल्यामुळे दिवसेंदिवस तंट्यामध्ये वाढ होत चालली आहे. पिंपळनेर परिसरात ५६ ग्रामपंचायती असुनही फक्त चार ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र शासनाने गावपातळीवर निर्माण होणारे छोटे-मोठे तंटे, भांडणे मिटावीत, गावागावात शांतता अबाधीत रहावी यासाठी तंटामुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी तंटामुक्तीला प्रतिसाद आहे मात्र पिंपळनेर परिसरात या अभियानास उदासिनता आली असल्याचे समोर आले आहे. पिंंपळनेर पोलीस ठाण्यार्तंगत ७६ गावांचा समावेश होतो. केवळ चारच ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला आहे. ५६ ग्रामपंचायतीमधुन या गावांचा कारभार चालत असुन यासाठी पिंपळनेर पोलीस ठाणे आहे. ठाण्यात दोन अधिकारी व २५ कर्मचारी आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम राबविणे अनिवार्य आहे. त्यासाठी १५ आॅगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभेमध्ये समितची निवड केली जाते परंतु पोलिसांची या बाबतची उदासिनता, ग्रामस्थ, ग्रामसेवक व सरपंच यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने मोहिमेस उतरती कळा लागली आहे. पिंपळनेर परिसरातील ५६ ग्रामपंचायतीमधील गुंधावाडी, वलीपुर जवळा, पिंपळादेवी, वाक नाथापुर या चार ग्रामपंचायतिंनी ठराव दिले आहेत. इतर ग्रामपंचायतिंनी सहभाग घेतला नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आहेत. या संर्दभात बोलताना पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शेख म्हणाले, ग्रामसेवकांनी ग्रामसभेचा प्रस्ताव देऊन सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ चार ग्रापंने ठराव दिला आहे. इतर ग्रा.पं.ना सुचना देण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)