शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विनानिविदा आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:59 IST

महापालिकेत मागील काही महिन्यांपासून आऊटसोर्सिंगची जोरदार धूम सुरू आहे. कोणतेही काम आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यावर अधिक ‘भर’ देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत मागील काही महिन्यांपासून आऊटसोर्सिंगची जोरदार धूम सुरू आहे. कोणतेही काम आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यावर अधिक ‘भर’ देण्यात येत आहे. शहरात रात्रीही साफसफाई करावी, अशी मागणी जोर धरताच प्रशासनाने विनानिविदा एका खाजगी एजन्सीमार्फत ५० मजूर नियुक्त करण्यास मान्यता दिली. नेहमी नियमांवर बोट ठेवणाºया प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून २२ डिसेंबर रोजी होणाºया स्थायी समितीसमोर प्रस्तावही सादर केला आहे.महापालिकेत बचत गटामार्फत साफसफाई करण्यात येते. एका खाजगी एजन्सीकडून सुरक्षारक्षक, वसुलीसाठी कर्मचारी, पाणीपुरवठ्यासाठी लाईनमन घेण्यात आले आहेत. याशिवाय संगणक आॅपरेटर म्हणून आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचे आऊटसोर्सिंग केले आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये आऊटसोर्सिंगवर खर्च होत आहेत. मागील महिन्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाजारपेठेतही रात्री साफसफाई करण्यात यावी, अशी सूचना प्रशासनाला केली. मनपा कर्मचाºयांमार्फत किंवा बचत गटामार्फत काम करावे, असा त्यांचा संदर्भ होता. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी २२ डिसेंबर रोजी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात नमूद केले आहे की, केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात रात्री सफाई केल्यास मनपाला अधिक गुण मिळणार आहेत. मनपात एक संस्था ज्या दरात मजूर पुरविण्याचे काम करीत आहे, त्याच दरात सर्वज्ञ एजन्सी ५० कर्मचारी मनपाला पुरविणार आहे. यातून रात्री बाजारपेठेत साफसफाई करण्यात येईल.एका मजुराला दरमहा १३ हजार ९५० रुपये मनपाला द्यावे लागतील, असे प्रस्तावात नमूद केले आहे.सर्वज्ञ एजन्सीला दोन महिन्यांपूर्वीच परवाना मिळालेला आहे. या एजन्सीकडे कोणताही अनुभव नाही.निविदा प्रक्रिया पार न पाडता थेट काम कसे काय देण्यात येत आहे. हा प्रस्ताव त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेता फेरोज खान यांनी आयुक्तांकडे केली आहे.निविदा का नाहीमहापालिकेला कोणतेही काम खाजगी एजन्सीकडून करून घ्यायचे असल्यास निविदा पद्धतीचा अवलंब करावा लागतो. एक खाजगी एजन्सी मनुष्यबळ पुरविण्याचे काम घेत असताना मनपाने निविदा पद्धतीचा अवलंब का केला नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती होती की, निविदा न मागविता एका एजन्सीला लाखो रुपयांचे काम देण्यात येत आहे.