शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

‘जलयुक्त’साठी ४ विभागांचेच प्रस्ताव

By admin | Updated: May 17, 2017 23:38 IST

बीड : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे.

व्यंकटेश वैष्णव ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यामध्ये कामे करण्यासाठी विविध विभागांकडून प्रस्ताव येणे अपेक्षित होते. मात्र, सद्यस्थितीला जिल्ह्यातील केवळ चार विभागांकडूनच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्तावित कामांची यादी पाठविल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन प्रस्ताव न पाठविलेल्या विभागांना चांगलेच खडसावले आहे. बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहेत. नव्याने मंजूर केलेल्या कामाबरोबरच दुसऱ्या टप्प्यातील राहिलेली अर्धवट कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. २०१४ च्या वित्त आयोगात ४९०० कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी केवळ १५०० कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित काम पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांच्यासमोर आहे. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना सिंग यांनी दिल्या.२०१७-१८ या वर्षामध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यासाठी कृषी, वन, जिल्हा परिषद हे विभाग सरसावले आहेत. कामांची संख्या लक्षात घेता इतर विभागांनीही अभियानातील कामांना हातभार लावणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत इतर विभागांमध्ये नैराश्य असल्याचे जाणवत आहे. स्वत: जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी भूजल, सामाजिक वनीकरण, जायकवाडी आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रस्तावित कामांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे योजनेला गती येण्यास मदत होईल.इतर विभागांनी हातभार लावला तरच १९४ गावातील ६ हजार प्रस्तावित कामे पूर्ण करण्यास मदत होईल. अन्यथा २०१४ प्रमाणेच कामे व गावे मंजूर असतील मात्र कामे पूर्ण होण्यास विलंब होईल.वर्ग २ ची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्तजलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करणाऱ्या कृषी, भूजल, सामाजिक वनीकरण, वन, जिल्हा परिषद, जायकवाडी या सर्वच विभागांमध्ये वर्ग २ ची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ही रिक्त पदे शासनाने भरावीत यासाठी जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.