शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘जलयुक्त’साठी ४ विभागांचेच प्रस्ताव

By admin | Updated: May 17, 2017 23:38 IST

बीड : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे.

व्यंकटेश वैष्णव ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यामध्ये कामे करण्यासाठी विविध विभागांकडून प्रस्ताव येणे अपेक्षित होते. मात्र, सद्यस्थितीला जिल्ह्यातील केवळ चार विभागांकडूनच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्तावित कामांची यादी पाठविल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन प्रस्ताव न पाठविलेल्या विभागांना चांगलेच खडसावले आहे. बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहेत. नव्याने मंजूर केलेल्या कामाबरोबरच दुसऱ्या टप्प्यातील राहिलेली अर्धवट कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. २०१४ च्या वित्त आयोगात ४९०० कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी केवळ १५०० कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित काम पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांच्यासमोर आहे. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना सिंग यांनी दिल्या.२०१७-१८ या वर्षामध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यासाठी कृषी, वन, जिल्हा परिषद हे विभाग सरसावले आहेत. कामांची संख्या लक्षात घेता इतर विभागांनीही अभियानातील कामांना हातभार लावणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत इतर विभागांमध्ये नैराश्य असल्याचे जाणवत आहे. स्वत: जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी भूजल, सामाजिक वनीकरण, जायकवाडी आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रस्तावित कामांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे योजनेला गती येण्यास मदत होईल.इतर विभागांनी हातभार लावला तरच १९४ गावातील ६ हजार प्रस्तावित कामे पूर्ण करण्यास मदत होईल. अन्यथा २०१४ प्रमाणेच कामे व गावे मंजूर असतील मात्र कामे पूर्ण होण्यास विलंब होईल.वर्ग २ ची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्तजलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करणाऱ्या कृषी, भूजल, सामाजिक वनीकरण, वन, जिल्हा परिषद, जायकवाडी या सर्वच विभागांमध्ये वर्ग २ ची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ही रिक्त पदे शासनाने भरावीत यासाठी जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.