शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

मालमत्ता-पाणीपट्टी वसुलीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:10 IST

मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीने तळ गाठला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीने तळ गाठला आहे. १ एप्रिल ते १ आॅक्टोबरपर्यंत फक्त ४३ कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसूल झाले आहेत. पाणीपट्टी वसुलीकडे तर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वत:हून पाणीपट्टी भरली तर मनपा ती जमा करून घेत आहे. स्वत: पाणीपट्टीच्या वसुलीसाठी अजिबात लक्ष देण्यात येत नाही. मागील काही महिन्यांपासून जीएसटीच्या अनुदानात वाढ झाल्याने महापालिका या निधीवरच उधळपट्टी करीत आहे.मालमत्ता कराचे उद्दिष्ट २७० कोटी ठरविण्यात आले आहे. या तुलनेत दहा टक्केही वसुली मनपाने केलेली नाही. वसुलीसाठी कर्मचारी नाहीत, अशी ओरड वॉर्ड अधिका-यांकडून करण्यात येत होती. आता आऊटसोर्सिंगच्या माध्यमाने तब्बल ९० कर्मचारी नऊ वॉर्ड कार्यालयांना देण्यात आले आहेत. मालमत्ता कराची डिमांड वाटणे आणि वसुली करणे हे काम या कर्मचा-यांकडून अपेक्षित आहे. मनपा या कर्मचाºयांवर दरमहा तब्बल १४ लाख रुपये खर्च करीत आहे. हा प्रयोग अयशस्वी ठरल्यास सर्व ९० कर्मचा-यांना घरी पाठविण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरणार नाही.कर लावण्यासाठीही दुर्लक्षमहापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला मालमत्तांना कर लावण्याासाठी स्वतंत्र कर्मचारी देण्यात आले आहेत. हे कर्मचारी सोयीच्या ठिकाणीच कर लावण्यात मग्न आहेत.अनेक ठिकाणी तर निव्वळ सेटलमेंटवर भर देत आहेत. पैठणगेट येथील एका व्यावसायिक इमारतीला अशाच पद्धतीने अभय देण्यात आले आहे. पैठणगेट भागात मोबाइल हब तयार झाला आहे. या भागातील दुकानांना कोणताही व्यावसायिक कर लावलेला नाही.