शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मालमत्ता कर वसुली; सहा दुकानांना सील !

By admin | Updated: March 11, 2017 00:20 IST

लातूर : लातुरातील व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील ३२ दुकानांवर जप्तीचा बडगा उगारला.

लातूर : लातुरातील व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी शहरातील ३२ दुकानांवर जप्तीचा बडगा उगारला. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने २६ दुकानदारांनी २० लाख रुपयांची थकबाकी जमा केली असून, सहा दुकानदारांनी थकबाकी न भरल्याने पथकाने त्यांच्या आस्थापनांना सील केले आहे. वर्षानुवर्षे मालमत्ता कराची थकबाकी न भरलेल्या व्यावसायिकांच्या आस्थापनांना सील करण्याची कारवाई मनपाने सुरू केली असून, गेल्या दोन दिवसांत ३२ आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी २६ जणांनी २० लाख रुपयांचा भरणा केला असून, ६ दुकानदारांनी मात्र मनपाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जप्ती पथकाने प्रभावती प्रभू बावगे यांच्या तीन दुकानांना सील केले आहे. त्यांच्याकडे ५० हजारांची थकबाकी आहे. रज्जाक सय्यद यांचेही दुकान सील केले असून, त्यांच्याकडे ४२ हजार ८४८ रुपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे. शैलेश चन्नाप्पा शेटे यांचेही दुकान सील करण्यात आले असून, त्यांच्याकडे १ लाख ९१ हजार ५५५ रुपयांची थकबाकी आहे. भागिरथी मदनलाल रांदड यांचेही दुकान सील करण्यात आले असून, त्यांच्याकडे १ लाख ३ हजार रुपयांची थकबाकी असून, काझी यांचे दुकानही सील करण्यात आले असून, त्यांच्याकडे ७ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे मनपाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी सांगितले.