शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

आता पुरे झाले मालमत्ताधारकांचे लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:32 IST

दैनंदिन अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे अवघड होऊन बसलेल्या महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना अडचणी येत असताना कंत्राटदारांचे देणे २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्केव्याज माफीची योजना सुरू केली. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाºयांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देजप्तीनंतर थेट लिलाव : १ फेबु्रवारीपासून मनपा थकबाकीदारांचा आवळणार फास

औरंगाबाद : दैनंदिन अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे अवघड होऊन बसलेल्या महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना अडचणी येत असताना कंत्राटदारांचे देणे २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्केव्याज माफीची योजना सुरू केली. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाºयांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.चालू आर्थिक वर्षात शहरातील अडीच लाख मालमत्ताधारकांकडून ४५० कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. मागील दहा महिन्यांमध्ये मनपाच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी फक्त ७८ कोटी रुपये आले. मालमत्ताकराच्या थकबाकीचा आकडा ५५० कोटींहून अधिक आहे. जास्त वसुली करण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पावले उचलली आहेत. नियमित मागणी वॉर्ड कार्यालये वसूल क रीत आहेत. बड्या थकबाकीदारांसाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्यांना रोजच्या रोज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. दंड व व्याजाच्या रकमेत सूट देण्याची योजना आतापर्यंत तीनदा राबविण्यात आली. थकबाकी भरण्यासाठी मालमत्ताधारक अजिबात प्रतिसाद देत नाहीत. आर्थिक वर्ष संपत आले असताना उद्दिष्टांच्या फक्त १७ टक्के वसुली आहे. सर्व उपाययोजना करूनही तिजोरीत चार पैसे येण्यास तयार नाहीत. १२ जानेवारीपासून मनपाने सुरू केलेल्या ५० टक्के व्याज माफीत फक्त ४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर योजनेला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.हतबल झालेल्या प्रशासनाने मालमत्ताधारकांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. तीत त्यांनी वसुलीचा आढावा घेतला. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याची सूचना त्यांनी केली. महापालिका आतापर्यंत केवळ जप्तीच्या कारवाया करीत होती. जप्त मालमत्ता थकबाकी भरल्यानंतर परत केली जात होती. मात्र यापुढे मालमत्तांचा लिलाव करून थकीत रक्कम वसूल केली जाणार आहे.----------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर