शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्मार्ट सिटीच्या योजनेचा स्वहिस्सा तातडीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेत स्वहिश्श्याची १४७ कोटी रुपयांची रक्कम तातडीने जमा करावी, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने ...

औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेत स्वहिश्श्याची १४७ कोटी रुपयांची रक्कम तातडीने जमा करावी, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने प्रशासकांना दिले आहेत. रक्कम न भरता केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यातून आलेला निधी खर्च करणे ही गंभीर आर्थिक अनियमितता असल्याचे शासनाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने ६३ कोटी रुपये भरले आहेत.

पाच वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये निवड झाली. योजनेतून शहरात एक हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यात केंद्र शासन ५० टक्के आणि राज्य शासन २५ टक्के निधी देणार आहे, तर उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून टाकावा लागणार आहे. आतापर्यंत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेनश प्रा. लिमिटेडला केंद्र शासनाकडून २९४ कोटी आणि राज्य सरकारकडून १४७ कोटी रुपये असा एकूण ४४१ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. यात १४७ कोटी रुपये मनपाला टाकणे बंधनकारक होते. महिनाभरापूर्वी स्मार्ट सिटीचे मेंटार बलदेवसिंह यांनी मनपाला स्वत:चा वाटा तातडीने जमा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पालिकेने ६३ कोटी रुपयांचा निधी जमा केला.

चौकट...

पत्रात काय म्हटले आहे...

मनपाचे स्वहिश्श्याची रक्कम उभारण्याबाबत काय नियोजन आहे, याचा तपशील सादर करावा, तसेच संपूर्ण स्वहिश्श्याची १४७ कोटींची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करावी, असे नगरविकास खात्याचे सहसचिव पी. जी. जाधव यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.