शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या योजनेचा स्वहिस्सा तातडीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेत स्वहिश्श्याची १४७ कोटी रुपयांची रक्कम तातडीने जमा करावी, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने ...

औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेत स्वहिश्श्याची १४७ कोटी रुपयांची रक्कम तातडीने जमा करावी, असे आदेश राज्याच्या नगरविकास खात्याने प्रशासकांना दिले आहेत. रक्कम न भरता केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यातून आलेला निधी खर्च करणे ही गंभीर आर्थिक अनियमितता असल्याचे शासनाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने ६३ कोटी रुपये भरले आहेत.

पाच वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये निवड झाली. योजनेतून शहरात एक हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यात केंद्र शासन ५० टक्के आणि राज्य शासन २५ टक्के निधी देणार आहे, तर उर्वरित २५ टक्के निधी महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून टाकावा लागणार आहे. आतापर्यंत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेनश प्रा. लिमिटेडला केंद्र शासनाकडून २९४ कोटी आणि राज्य सरकारकडून १४७ कोटी रुपये असा एकूण ४४१ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. यात १४७ कोटी रुपये मनपाला टाकणे बंधनकारक होते. महिनाभरापूर्वी स्मार्ट सिटीचे मेंटार बलदेवसिंह यांनी मनपाला स्वत:चा वाटा तातडीने जमा करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पालिकेने ६३ कोटी रुपयांचा निधी जमा केला.

चौकट...

पत्रात काय म्हटले आहे...

मनपाचे स्वहिश्श्याची रक्कम उभारण्याबाबत काय नियोजन आहे, याचा तपशील सादर करावा, तसेच संपूर्ण स्वहिश्श्याची १४७ कोटींची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करावी, असे नगरविकास खात्याचे सहसचिव पी. जी. जाधव यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.